AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाहीतर आमच्या लोकांनी घड्याळाला मतं दिली असती का? सुरेश धस बोलून मोकळे झाले ? आता महायुतीत…

धाराशिवमध्ये बोलताना भाजप आमदार सुरेश धस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदे यांचा बाण आणि  अजित पवारांचे घड्याळ देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी निवडून दिले, असं त्यांनी म्हटलं आहे.

नाहीतर आमच्या लोकांनी घड्याळाला मतं दिली असती का? सुरेश धस बोलून मोकळे झाले ? आता महायुतीत...
| Updated on: Feb 23, 2025 | 7:16 PM
Share

धाराशिवमध्ये बोलताना भाजप आमदार सुरेश धस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदे यांचा बाण आणि  अजित पवारांचे घड्याळ देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी निवडून दिले, असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे. सुरेश धस यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. महायुतीमध्ये वातावरण तापण्याची शक्यात आहे.

नेमकं काय म्हणाले सुरेश धस? 

एकनाथ शिंदे यांचा बाण आणि  अजित पवारांचे घड्याळ देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी निवडून दिले. विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या, सोबत घड्याळ आणि बाणालाही लोकांनी मत दिलं.  नाहीतर आमच्या लोकांनी घड्याळाला मत दिली असती का? असा प्रश्न सुरेश धस यांनी यावेळी केला आहे. दरम्यान सुरेश धस यांच्या या वक्तव्यामुळे आता महायुतीत पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, बाणाची आणि आमची जुनी दोस्ती, मात्र एकनाथ शिंदे यांचा बाणही लोकांनी निवडून दिला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. महाराष्ट्रात कार्यकर्ते सांभाळणारा नेता जर कोणी असेल तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, असं धस यांनी म्हटलं आहे. ते  धाराशिवमधील परंडा येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. भाजप नेते सुजितसिंह ठाकूर  यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

दरम्यान मी जे निवडून आलो त्यामध्ये माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचा सिंहाचा वाटा आहे. माझ्या विजयामध्ये धाराशिव जिल्ह्याचा मोठा वाटा आहे, आणीबाणीच्या काळात माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी काम केलं आहे.  गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन यांच्याबरोबर सुजितसिंह ठाकूर यांनी काम केले आहे. 29 वर्ष पक्षाच्या सतरंज्या उचलण्याचे काम सुजितसिंह ठाकूर यांनी केले. भारत उदयचा कार्यक्रम झाला तर त्याची महत्वाची जबाबदारी सुजितसिंह ठाकूर यांना दिली होती, असंही यावेळी सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

Follow Us
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं...
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं....
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र.
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?.
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा..
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा...
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा.
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी.
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया.
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?.
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ.