AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सरकार आलं म्हणजे मस्ती आली का तुम्हाला, त्यांना थांबवलं कसं जात नाही?’ संतोष बांगर यांच्या कृतीवरुन अजितदादांचा शिंदे-फडणवीसांना सवाल

शिंदे सरकारमधील काही आमदारांना आपण एक सरकारचा भाग असल्याच विसर पडत आहे. कोण याला ठोका, त्याचा कोथळा बाहेर काढा असली भाषा वापरत आहे. एका लोकप्रतिनीधीच्या तोंडून ही भाषा शोभनीय नाही. आमदारांची अशी भाषा म्हणजे महाराष्ट्रात संघर्ष पेटवणारी आहे. कोण अधिकाऱ्यांना मारतंय तर कोण डॉक्टरांनाच धमकी देतयं असं म्हणत अजित पवार यांनी आमदारांच्या वर्तणुकीबद्दल सवाल उपस्थित केले आहेत.

'सरकार आलं म्हणजे मस्ती आली का तुम्हाला, त्यांना थांबवलं कसं जात नाही?' संतोष बांगर यांच्या कृतीवरुन अजितदादांचा शिंदे-फडणवीसांना सवाल
विरोधी पक्षनेते अजित पवारImage Credit source: tv9 marathi
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Aug 16, 2022 | 6:43 PM
Share

मुंबई : शिवसेनतून (Rebel MLA) बंडखोरी करीत शिंदे गटात सहभागी झालेले (Santosh Bangar) आ. संतोष बांगर हे गेल्या काही दिवसांपासून कायम चर्चेत राहिलेले आहेत. कोण गद्दार म्हणाले तर त्याच्या कानशिलात लावा असा आदेशच त्यांनी कार्यकर्त्यांना दिला होता. त्यानंतर हास्पीटलमधील बील कमी करण्यावरुन त्यांनी एका डॉक्टराला धमकी दिली होती हे कमी म्हणून की काय, सोमवारी त्यांनी निकृष्ट दर्जाचे भोजन कामगारांना दिले जात असल्याने एका उपहागृहाच्या व्यवस्थापकाच्याच कानशिलात लगावली. मात्र, या सर्वाचा समाचार विरोधी पक्षनेते (Ajit Pawar) अजित पवार यांनी घेतला आहे. सरकार आलं म्हणजे मस्ती आली का असे म्हणत, त्यांना थांबवल कसं जात नाही असा सवाल त्यांनी शिंदे सरकारला विचारला आहे.

महाराष्ट्रात संघर्ष पेटवण्याची भाषा

शिंदे सरकारमधील काही आमदारांना आपण एक सरकारचा भाग असल्याच विसर पडत आहे. कोण याला ठोका, त्याचा कोथळा बाहेर काढा असली भाषा वापरत आहे. एका लोकप्रतिनीधीच्या तोंडून ही भाषा शोभनीय नाही. आमदारांची अशी भाषा म्हणजे महाराष्ट्रात संघर्ष पेटवणारी आहे. कोण अधिकाऱ्यांना मारतंय तर कोण डॉक्टरांनाच धमकी देतयं असं म्हणत अजित पवार यांनी आमदारांच्या वर्तणुकीबद्दल सवाल उपस्थित केले आहेत. शिवाय हे शाहु फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात शोभणारे नसल्याचेही पवार म्हणाले आहेत.

मुख्यमंत्रीही निर्धास्त, थांबवलं गेले पाहिजे

सरकारमधील काही आमदार हे अरेरावीची भाषा करीत आहेत. लोकप्रतिनीधींनीच असे केले तर इतरांचे काय? एकदा नव्हे तर गेल्या महिन्याभरात अनेकवेळा अशा बाबी समोर आल्या आहेत. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे काय अनभिज्ञ आहेत का असा सवाल उपस्थित करीत त्यांना वेळीच रोखलं गेले पाहिजे असे पवारांनी सुनावलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय समज देणार का हे पहावे लागणार आहे.

नेमका काय घडला प्रकार?

आता कामगारांना मध्यान्ह भोजन पुरवण्याची जबाबदारी ही खासगी कंत्राटदारांना देण्यात आली आहे. मात्र, कंत्राटदारांकडून कामगारांना खाण्यायोग्यही अन्न दिले जात नाही. हिंगोली जिल्ह्यातील एका उपहारगृहाला बांगर यांनी भेट दिली असती तेथील प्रकार उघडकीस आला आहे. मध्यान्ह भोजनात आळ्या आणि माशा पडलेल्या त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत उपहारगृहाच्या व्यवस्थापकास विचारणा केली असता हे चुकून झाले, येथून पुढे होणार नाही असे म्हणताच बांगर यांनी त्याच्या कानशिलात लगावली.

Follow Us
एकीचा संदेश, पण 24 आमदार गायब! महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय घडल
MVA Meeting | एकीचा संदेश, पण 24 आमदार गायब! महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
5 जणांना मारलं, बॉम्ब... राऊतांचा संजय दिना पाटलांवर लेटर बॉम्ब...
मोठी बातमी! 5 जणांना मारलं, बॉम्ब... राऊतांचा संजय दिना पाटलांवर लेटर बॉम्ब; थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार
दिल्ली ते मुंबई...ऑपरेशन टायगरचा मास्टरमाइंड कोण?
Operation Tiger | दिल्ली ते मुंबई...ऑपरेशन टायगरचा मास्टरमाइंड कोण?; खासदारांच्या प्रवेशामागे भाजपच्या त्या सर्वात मोठ्या नेत्याची शिष्टाई मोलाची
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा