AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबरनाथचा पारा 42 अंशांवर, विदर्भालाही टाकलं मागे; राज्यातील इतर जिल्ह्यांची स्थिती काय?

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचे तीव्र चटके बसू लागले आहेत. येत्या दोन दिवसात राज्यात तीव्र उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. काही जिल्ह्यात तर येलो आणि ऑरेंज अॅलर्टही देण्यात आला आहे.

अंबरनाथचा पारा 42 अंशांवर, विदर्भालाही टाकलं मागे; राज्यातील इतर जिल्ह्यांची स्थिती काय?
राज्यात उष्णतेची लाट Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 15, 2022 | 4:40 PM
Share

ठाणे: राज्यात गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचे तीव्र चटके बसू लागले आहेत. येत्या दोन दिवसात राज्यात तीव्र उष्णतेची लाट (Heat wave in Maharashtra) येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. काही जिल्ह्यात तर येलो आणि ऑरेंज अॅलर्टही देण्यात आला आहे. मागील दोन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात (thane) उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर या शहरांमध्ये तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. हवेतली आर्द्रताही कमी झाल्यानं कडक उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागतोय. आज दुपारी अंबरनाथ शहरात 42 अंश इतक्या तापमानाची नोंद झाली. याचवेळी विदर्भात मात्र 38 ते 39 अंशांवर पारा होता. त्यामुळे तापमानात अंबरनाथ (ambernath) शहरानं विदर्भालाही मागे टाकल्याचं पाहायला मिळालं. अंबरनाथमध्ये दुपारच्या या उन्हात नागरिकांना अक्षरशः चटके बसू लागल्यानं नागरिकांनी शितपेयांच्या गाड्यांवर गर्दी केल्याचंही दिसत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासूनच तापमानाचा पारा वाढताना पहायला मिळतोय. आज आणि उद्या दोन दिवस कोकणात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली होती. हवामान खात्याचा हा अंदाज खरा होताना पहायला मिळतोय. कारण कालपासून रत्नागिरी जिल्ह्यातील तापमान वाढतंय. काल राज्यातील सर्वात जास्त म्हणजे 39 अंशाहून अधिक तापमान रत्नागिरीत नोंदवलं गेलं. आज सकाळपासून हा तापमानाचा पारा वाढतोय. लोकांच्या अंगाची लाहीलाही होताना पाहायला मिळतेय.

नंदूरबारमध्ये रस्ते ओस

नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊन पोहोचला आहे. अजूनही तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. वाढत्या उष्णतेपासून संरक्षणाच्या सर्व उपाययोजना करण्याचे आव्हान करण्यात येत आहे. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहत असल्याने दुपारीच रस्ते ओस पडू लागले आहेत. तर नागरिक दुपारच्या वेळेस घराबाहेर पडणे टाळत आहेत. तापमान अधिक वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या उन्हाळी पिकांची काळजी घ्यावी तसेच या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, तसेच फळधारणा करणाऱ्या बागांमध्ये शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

औरंगाबाद तापले

औरंगाबाद शहराच्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे. आज सकाळी 9 वाजताच औरंगाबाद शहराचे तापमान 29 अंश सेल्सिअसवर पोहोचले होतेय. दुपारी दोन वाजेपर्यंत तापमान 38 अंश सेल्सिअसवर गेले होते. सकाळी 9 वाजल्यापासूनच जाणवतोय शहरात उन्हाचा कडाका जाणवत असल्याने नागरिक हैराण झाले होते.

नागपूर, अकोल्यात लाहीलाही

नागपूरसह विदर्भातही तापमान वाढलंय. विदर्भात अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद येथे झाली आहे. अकोल्यात 39 तर इतर शहरांमध्ये सुद्धा पारा 37 अंशाच्या पुढं गेलाय. दिवसा उष्ण वारे वाहू लागले आहेत. त्यामुळं घरोघरी कुलर सुरू झालंय. दिवसा घराबाहेर पडणं कठीण झाल्याने कामानिमित्त घराबाहेर पडताना नागरिक विशेष काळजी घेताना दिसत आहेत. विदर्भात पुढील दिवसांमध्ये तापमान वाढणार असून उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.

संबंधित बातम्या:

शक्ती कायद्यावर अखेर राष्ट्रपतींची सही, दिलीप वळसे-पाटलांची विधानसभेत माहिती; काय आहे शक्ती कायदा?

Maharashtra News Live Update : वांद्रेच्या स्टेलर वर्ल्ड स्कूल शाळेत आयटीचे छापे

नागपूरसह विदर्भात तापमानात वाढ, लवकरच येणार उष्णतेची लाट?

Follow Us
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर...
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत; उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत;  उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी सांगितलं बैठकीत काय घडलं?
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर....
Parbhani | परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर, गावकऱ्यांची मदतीसाठी आर्त हाक!