AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूरसह विदर्भात तापमानात वाढ, लवकरच येणार उष्णतेची लाट?

पश्चिम विदर्भात तापमान जास्त राहणार आहे. वर्धा जिल्ह्यात उष्णतेची लाट जास्त राहणार आहे. आकाश कोरडे राहणार आहे. राजस्थानकडून गरम हवा वाहत आहे. त्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. असा अंदाज नागपूर हवामान विभागानं वर्तवला आहे.

नागपूरसह विदर्भात तापमानात वाढ, लवकरच येणार उष्णतेची लाट?
विदर्भात उष्माघाताची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Mar 15, 2022 | 4:19 PM
Share

नागपूर : नागपूरसह विदर्भात तापमानात वाढ झाली आहे. येत्या दोन दिवसांत विदर्भात उष्णतेची लाट (Heat wave in Vidarbha) येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. पश्चिम विदर्भात तापमान जास्त राहणार आहे. वर्धा जिल्ह्यात उष्णतेची लाट जास्त राहणार आहे. आकाश कोरडे राहणार आहे. राजस्थानकडून (Rajasthan ) गरम हवा वाहत आहे. त्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. असा अंदाज नागपूर हवामान विभागानं (Nagpur Meteorological Department) वर्तवला आहे. येत्या दोन दिवसांत तापमानात आणखी वाढ होणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भात पारा 16 मार्चपासून चाळीशी पार करणार आहे. बुधवारपासून नागपुरात 40 ते 41 डिग्री अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाचा पारा जाणार आहे. त्यामुळं दुपारी घराबाहेर पडणाऱ्यांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. दुपारी घराबाहेर पडणे कठीण होणार आहे.

तापमान 41 ते 42 अंश सेल्सिअसपर्यंत जाणार

15 मार्च रोजी चंद्रपुरात 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बुधवारपासून ही 41 अंश सेल्सिअस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. अकोला जिल्ह्यात आज 40 डिग्री सेल्सिअस तापमाना उद्या तो येत्या आठवड्यात 41 ते 42 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. अमरावती जिल्ह्यातही तापमान उद्यापासून 41 डिग्री अंस सेल्सिअसपेक्षा जास्त राहणार आहे. अशीच काहीसी परिस्थिती विदर्भातील इतर जिल्ह्यात राहणार आहे. हवामान विभागानं हा अंदाज व्यक्त केला आहे.

अशी घ्या काळजी

येत्या एक-दोन दिवसांत उष्णतेची लाट येणार असल्यानं दुपारी 12 ते 3 च्या दरम्यान घराबाहेर पडणे टाळावे. थोड्या-थोड्या वेळाने पाणी पित राहावे. हलके तसेच पातळ पदार्थांचे सेवन करावे. तसेच सुती कपडे वापरावे. घराबाहेर पडताना सनग्लास, छत्री, स्कार्प, टोपी यांचा वापर करावा, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

पोलीस उपनिरीक्षक पदाची शारीरिक चाचणी, अमरावतीच्या शेतकऱ्याची लेक विदर्भात प्रथम

युवक काँग्रेस निवडणूक, तौसिफ खान नागपूरचे शहराध्यक्ष, निवडणुकीत गैरप्रकार झालाय?

अनिल देशमुखांना दिलासा नाहीच! जामीन अर्ज कोर्टाने नाकारला, अडचणी आणखी वाढणार?

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.