Nana Patole | मोहन भागवत हे मोदी सरकारचे रिमोट कंट्रोल, नाना पटोले यांचा अमरावतीत घणाघात

नाना पटोले म्हणाले, संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे केंद्रातील भाजप सरकार जुने मुरदे उखरण्याचे काम करत आहेत. मोदी सरकारचे रिमोट कंट्रोल मोहन भागवत आहेत. भाजप आणि संघ वेगळा विषय नाही हे सगळ्यांनाच माहीत आहे.

Nana Patole | मोहन भागवत हे मोदी सरकारचे रिमोट कंट्रोल, नाना पटोले यांचा अमरावतीत घणाघात
मोहन भागवत हे मोदी सरकारचे रिमोट कंट्रोल, नाना पटोले यांचा घणाघात Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 12:27 PM

अमरावती : महाविकास आघाडीमधील मंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांना भेटत असतील तर चांगली बाब आहे. कारण महाराष्ट्राची परंपरा कायम राहिली पाहिजे. या पद्धतीचं काम होणे गरजेचे आहे. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) जातील. प्रत्येक पक्षाला आपली आपली रणनीती करण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यामुळे राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुका बिनविरोध व्हाव्या अशी अपेक्षा आहे, असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलंय. अमरावतीत ते आज बोलत होते. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल नाना पटोले म्हणाले, राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) भोंग्याच्या मुद्द्यामुळे धार्मिक विरोध वाढायचा होता तो वाढला. यामध्ये हिंदू मुस्लिमांच्या मंदिर मशिदीवरील भोंग्याचा आवाज कमी करण्यात आला. गावोगावी काकड आरत्या बंद झाल्या. शिर्डीमध्ये काकड आरतीतून वातावरण निर्माण व्हायचं ते मला जाणवलं नाही. न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे भोंग्याची कारवाई करावी अशी अपेक्षा आहे. धार्मिक द्वेष निर्माण झाला. यामध्ये जनतेचे मूळ प्रश्न बाजूला पडतात, असंही पटोले म्हणाले.

महागडे बियाणे शेतकऱ्यांना देऊ नये

सचिन वाझे माफीचा साक्षीदार होणार का, यावर नाना पटोले म्हणाले, सचिन वाझे बद्दल सामनामध्ये आज येत असेल पण आम्ही यापूर्वीच हा प्रश्न विधानसभेत मांडला. त्या ठिकाणी मी एकटाच विरोध करत होतो, ही स्क्रिप्ट आहे. त्यादिवशी मी सांगितलं हे राज्याला बदनाम करण्याचं काम आहे. दरम्यान, महाबीजबद्दल पटोले यांनी सांगितलं की, बच्चू कडू यांनी सांगितल्याप्रमाणे असे असेल तर त्या व्यवस्थेवर कारवाई झाली पाहिजे. चांगल्या दर्जाचे सोयाबीन बियाणे आणि कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांना मिळेल अशा प्रकारचे धोरण राज्य सरकारने करावे. महागडे बियाणे शेतकऱ्यांना देऊ नये.

भाजप आणि संघ वेगळा विषय नाही

नाना पटोले म्हणाले, संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे केंद्रातील भाजप सरकार जुने मुरदे उखरण्याचे काम करत आहेत. मोदी सरकारचे रिमोट कंट्रोल मोहन भागवत आहेत. भाजप आणि संघ वेगळा विषय नाही हे सगळ्यांनाच माहीत आहे. अमरावती लोकसभा निवडणुकीबद्दल नाना पटोले म्हणाले, अमरावती लोकसभा मतदारसंघात पुढचा खासदार काँग्रेसचाच निवडून येणाराय. काँग्रेस जवळ अमरावती लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी खूप सारे उमेदवार आहेत. कार्यकर्त्यांनी आपल्या भावना मांडणे हे चुकीचं नाही. अनेकांना वाटत होतं अमरावतीमध्ये काँग्रेसजवळ उमेदवार नाही.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.