रवी राणा यांची बच्चू कडूंवर खोचक टीका, काय करतो याचा पाढाच वाचला…

| Updated on: Oct 19, 2022 | 4:52 PM

तोडीबाज म्हणून त्यांची ओळख आहे. मी तोडीबाज आमदार नाही.

रवी राणा यांची बच्चू कडूंवर खोचक टीका, काय करतो याचा पाढाच वाचला...
रवी राणा यांची बच्चू कडूंवर खोचट टीका
Image Credit source: tv 9
Follow us on

अमरावती : खासदार नवनीत राणा यांच्याकडून दिवाळाचा किराणा वाटप होत आहे. काही दिवसांपूर्वीचं राणा यांनी किराणा वाटपाचा शुभारंभ केला आहे. यावर आमदार बच्चू कडू यांनी टीका केली. एकीकंड खिसे कापायचे आणि दुसरीकडं किराणा वाटायचं, असा आरोप त्यांनी केला. यावर आमदार रवी राणा म्हणाले, मी आमदार होण्यापूर्वीपासून प्रामाणिकपणे किराणा वाटतो. गेल्या पंधरा वर्षांपासून हे काम सुरू आहे. गोरगरिबांचा कैवारी म्हणून मी काम करतो. शेतकरी संकटात होते. तेव्हा अनेक लोकं नेत्यांसोबत वावा करत होते. मी शेतकऱ्यांसाठी जेलमध्ये होतो. उद्धव ठाकरे सरकारनं चार दिवस जेलमध्ये टाकले.

मला वाटतं बच्चू कडू सोंगाड्या आहे. मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही. बच्चू कडू जे काही आंदोलन करतात, ते तोडीसाठी करतात. तोडीबाज म्हणून त्यांची ओळख आहे. मी तोडीबाज आमदार नाही.

रवी राणात धमक आहे. म्हणून रवी राणा किराणा वाटते. गोरगरिबांचा उपचार करून देते. मुलांना शिक्षणासाठी मदत करते. गोरगरिबांच्या लग्नासाठी मदत करते. कोणी मृतक झाला, तर त्याच्या क्रियाकर्मासाठी मदत करते. आदिवासी कुटुंबांना रवी राणा आपला पगार देते. भीक मागणाऱ्या महिलेला घर बांधून देते. छत देते. रवी राणा छाती ठोकून लोकांना मदत करते.

बच्चू कडू यांनी आरोप करताना दहा वेळा विचार केला पाहिजे. बच्चू कडू यांचं जीवनच पैसे आहेत. निवडणुका आल्या का त्यांना पैसा पाहिजे. कुणाला पाठिंबा द्यायचा आहे तर दमडी पाहिजे. संतांच्या विचाराची वागणूक असली पाहिजे.

दिवाळीचा शिधा यावर बोलताना रवी राणा म्हणाले, लवकरच सरकारचा दिवाळीचा किराणा हा लोकांना मिळणार आहे. अनेक ठिकाणी पोहचला आहे काही ठिकाणी पोहचणार आहे. चांगली योजना आहे करता करता थोडा उशीर होतो.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत रवी राणा यांनी सांगितलं की, राज्य सरकार मजबूत आहे. जनतेचे काम थांबले नाही. लोकांची कामं होत आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार होवो किंवा नाही त्याचा काय फरक नाही.बच्चू कडू हे बिना बुडाचे लोटे आहेत. काही असतात फितूर पलटी मारणारे.