AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prakash Ambedkar on Ajit Pawar | अजित पवार टीव्हीशी बोलण्यापेक्षा वकिलांना घेऊन खुली चर्चा का करत नाहीत? प्रकाश आंबेडकरांचा सवाल

देशात भाजपने दडपशाहीचे राजकारण सुरू केलं आहे. उठ सूट कोणालाही ईडीच्या नोटीस दिल्या जात आहेत. भाजपाने देशात मोकळं वातावरण ठेवलं नाही. मलाही ईडीची नोटीस दिली होती.

Prakash Ambedkar on Ajit Pawar | अजित पवार टीव्हीशी बोलण्यापेक्षा वकिलांना घेऊन खुली चर्चा का करत नाहीत? प्रकाश आंबेडकरांचा सवाल
अजित पवार, प्रकाश आंबेडकर.Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: May 21, 2022 | 4:01 PM
Share

अमरावती : ओबीसी आरक्षण मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) लागू झाले. मग महाराष्ट्रात का नाही, यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, यासंदर्भात मी दोन दिवसांत स्वतंत्र भूमिका मांडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे टीव्हीशी बोलतात. पण, त्यांनी त्याऐवजी वकिलांशी (Advocate) खुली चर्चा करावी. त्यातून काहीतरी मार्ग निघेल. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्यायला नकोत, असं मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, राज्यातील राजकीय पक्ष (Political Party) हे गुलाम झाले आहेत. त्यांनी वकिलांशी चर्चा करून त्यातून मार्ग काढावा. श्रीमंत मराठा गरिबांशी इमानदारी राखू शकत नाही. ओबीसींनी आता भूमिका घेतली पाहिजे की, सत्ताधारी श्रीमंत मराठ्यांना मतदान करणार नाही. तरच ओबीसींचं आरक्षण त्यांना मिळेल अन्यथा नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

दम असेल तर मला उचलून दाखवावं

देशात भाजपने दडपशाहीचे राजकारण सुरू केलं आहे. उठ सूट कोणालाही ईडीच्या नोटीस दिल्या जात आहेत. भाजपाने देशात मोकळं वातावरण ठेवलं नाही. मलाही ईडीची नोटीस दिली होती. दम असेल मला उचलून दाखवून कारवाई करावी, असे थेट आवाहन वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला दिलं. मात्र यावेळी भाजपावर टीका करताना प्रकाश आंबेडकर यांची जीभ घसरली होती.

तरच अशा दंगली थांबतील

ज्ञानव्यापी प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सुप्रीम कोर्ट, हायकोर्टमध्ये असे अनेक जज आहेत. ज्यांच्या व्यक्तिगत प्रॉपर्टी आहेत. एखाद्याने इतिहास कालीन पुरावे सादर करून जागेवर हक्क सांगितला, तर कोर्ट एंटरटेन करेल का ? याचा खुलासा झाला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारच्या अनेक याचिका यायला सुरुवात होईल. दरम्यान, मुसलमानांमधला काही वर्ग जो आजही पंढरपूरची वारी करतो आणि हिंदूमधला एक वर्ग जो दर्ग्यावर आजही चादर चढवतो. या दोन्ही समाजातील मंडळींनी पुढे यावे. तरच अशा दंगली थांबतील, असंही आंबेडकर म्हणाले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.