AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेकडो लोकांना तणावमुक्त करणाऱ्या डॉक्टरानेच तणावातून आयुष्य संपवलं, अकोल्यातील दुर्दैवी घटना

अकोल्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरानेच विषारी इजेक्शन घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे.

शेकडो लोकांना तणावमुक्त करणाऱ्या डॉक्टरानेच तणावातून आयुष्य संपवलं, अकोल्यातील दुर्दैवी घटना
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 21, 2025 | 6:33 PM
Share

अकोल्यामधून मोठी बातमी समोर येत आहे, मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांनी आत्महत्या केली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.  मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी आत्महत्या केली. त्यांनी विषारी इंजेक्शन घेऊन आपलं जीवन संपवल्याची  माहिती समोर येत आहे. ते अकोल्यामधील सन्मित्र हॉस्पिटलमध्ये नोकरीला होते. त्यांनी आपल्या राहात्या घरी आत्महत्या केली.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मानसोपचा तज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी आपल्या  न्यू तापडिया नगर भागातील राहत्या घरी आत्महत्या केली. विषारी इजेक्शन घेऊन त्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. ते अकोल्यामधील सन्मित्र हॉस्पिटलमध्ये नोकरीला होते. या घटनेनं वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

आत्महत्येचं कारण अस्पष्ट 

अकोल्यात मानसोपचार तज्ज्ञानेच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत जावरकर यांनी आत्महत्या केली. त्यांनी आपल्या राहात्या घरी विषारी इंजेक्शन घेऊन आपलं आयुष्य संपवलं. या घटनेनं खळबळ उडाली आहे. मात्र त्यांनी आत्महत्या का केली यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. ते अकोल्यातील सन्मित्र हॉस्पिटलमध्ये नोकरीला होते.

अनेकांना केलं तणावमुक्त 

डॉ. प्रशांत जावरकर हे अकोल्यामधील एका रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करत होते. ते गेल्या अनेक वर्षांपासून याच हॉस्पिटलमध्ये कामाला होते. त्यांनी आपल्या करिअरमध्ये तणावात असलेल्या शेकडो लोकांना समुपदेशन करून तणावमुक्त केलं. मात्र त्यानंतर त्यांनी स्वत:च आत्महत्या केली आहे.

डॉ.  प्रशांत जावरकर यांनी आपल्या न्यू तापडिया नगर भागातील राहत्या घरी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. मात्र त्यांनी आत्महत्या का केली? आत्महत्येमागं नेमकं काय करण होतं? हे अद्याप स्पष्ट झालं नाही. मात्र त्यांनी कुठल्या तरी तणावातून आपलं आयुष संपवलं असावं अशी चर्चा सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.