AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कसला दगडाचा न्याय देणार ?अंजली दमानिया यांचं वक्तव्य

संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने आरोपींना आता वैद्यकीय जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कसला दगडाचा न्याय देणार ?अंजली दमानिया यांचं वक्तव्य
| Updated on: Jan 23, 2025 | 1:33 PM
Share

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख निर्घृण हत्याकांडातील आरोपी असलेल्या वाल्मीक कराड याच्यासह सहा आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी कोर्टात तपास संपल्याचे सांगितल्याने न्यायालयाने सहा आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात वाल्मीक कराड याच्या सह सर्व आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे. या आरोपींना आता अगदी राजा महाराजासारखी ट्रीटमेंट मिळालयला ते आता मोकळे झाल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे.

संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्ये प्रकरणात आरोपींना कालच न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे आता या आरोपींना न्यायालयाच्या देखरेखी खाली पोलिसांना त्यांची रोज चौकशी करावी लागणार आहे. या संदर्भात हे प्रकरण सुरुवातीपासून लावून धरणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात न्यायालयीन कोठडी इतक्या लवकर दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की पीडित संतोष देखमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी एक व्हिडीओ आपल्याला पाठवला आहे. तो व्हिडीओ पाहिल्यानंतर मला खूप राग आला आहे. आपली सिस्टीम इतकी सडली आहे. पोलीस प्रशासन काम करीत नाहीए.

धनंजय देशमुख यांनी मला एक रात्री व्हिडिओ पाठवला तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मला इतका राग आलाय आपली सिस्टीम किती सडले की कोणीच काम करत नाहीयेत… पोलीस प्रशासन कोणीच काम करत नाहीये. आरोपी कुठे गेले होते. याची माहिती सीसीटीव्हीत कैद झाल्याची ही माहिती आहे. या व्हिडिओचा उल्लेख देखील पीसीआरमध्ये नाही असाही त्रागा त्यांनी व्यक्त केला आहे.

या आरोपीला मी केव्हा बेड्यात पाहीलेले नाही

पोलीसांनी तपास संपला म्हणून सांगितलं नंतर न्यायालयाने त्या महाशयांना न्यायालयीन कोठडी मिळाली. या आरोपीला मी केव्हा बेड्यात पाहीलेले नाही. ते राजा महाराजा नाहीत गुन्हेगार आहेत. त्यांना राजकीय वरदहस्त आहे. सर्वांना पत्र लिहून देखील त्यांचा वरदहस्त संपत नाही. हे सर्व पाहून माझे डोके दुखत आहे. पोलिसांना आणि इतरांना काही कळत नाही. सगळ्यांना सर्व माहिती आहे की हा सराईत गुंड आहे. कसे बीडला लुटले कशी संपत्ती मिळविली सर्वांना माहिती आहे.

भुजबळ यांना कशी कळ यायची ?

न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांना आता वैद्यकीय कारणाखाली जामीनावर जायचे आहे. भुजबळांना कशी जेलमध्ये असताना छातीत कळ यायची. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेतील एसीमध्ये बसवतील आणि लोक येऊन त्यांना भेटतील याचीच भीती होती मला आणि हळूहळू मेडिकल बेल मिळण्याची भीती होती तसेच होणार असेही अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

न्यायालयाने स्ट्राँग भूमिका घ्यावी यासाठी मी मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहीले आहे. फडणवीस आणि अजित दादांकडून न्याय मिळेल असं वाटत नाही… सगळ्यांनी एक ट्वीट केल पाहिजे..धनंजय मुंडे यांच्या राजीनामा पाहिजे. ते आमदार म्हणून राहूच शकत नाहीत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कसला दगडाचा न्याय देणार, ते भ्रष्टाचारात गुंतले आहेत, भ्रष्टाचारात बुडाले आहेत असेही त्या म्हणाल्या.

Follow Us
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा.