AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीमुळे सुजय विखेंना काँग्रेस सोडावी लागल्याची अशोक चव्हाणांना खंत

नांदेड : सुजय विखे पाटील यांचा भाजप प्रवेश काँग्रेससाठी धक्का मानला जातो. पण हा धक्का नाही. राजकारणात  कमी-जास्त प्रमाणात अशा गोष्टी घडत असतात. यामुळे काँग्रेसला फारसा फरक पडणार नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. मात्र सुजय यांचा भाजप प्रवेश दुर्दैवी बाब असल्याचं ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांची फोडाफोडीची नीती लोकशाहीला मारक आहे. त्यांची साम […]

राष्ट्रवादीमुळे सुजय विखेंना काँग्रेस सोडावी लागल्याची अशोक चव्हाणांना खंत
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM
Share

नांदेड : सुजय विखे पाटील यांचा भाजप प्रवेश काँग्रेससाठी धक्का मानला जातो. पण हा धक्का नाही. राजकारणात  कमी-जास्त प्रमाणात अशा गोष्टी घडत असतात. यामुळे काँग्रेसला फारसा फरक पडणार नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. मात्र सुजय यांचा भाजप प्रवेश दुर्दैवी बाब असल्याचं ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांची फोडाफोडीची नीती लोकशाहीला मारक आहे. त्यांची साम दाम दंड भेदाची ही नीती असल्याचं चव्हाण म्हणाले. सुजयने थोडा विचार करायला हवा होता. शिवाय राष्ट्रवादीने सामंजस्याची भूमिका घेतली असती तर हा प्रसंग आला नसता, अशी खंत देखील अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.

दरम्यान, सुजय यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील सध्या राज्याचे विरोधी पक्ष नेते आहेत. त्यामुळे मुलाच्या भाजप प्रवेशाचा वडिलांवर काही परिणाम होणार का याबाबत अशोक चव्हाणांना विचारण्यात आलं. यावरही त्यांनी उत्तर दिलं. या बाबतीत मी काही बोलू शकणार नाही, पण या पक्ष प्रवेशाची दखल पक्ष अध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतली आहे. याबाबतीत त्यांनी आपल्याशी चर्चा केल्याचं चव्हाण म्हणाले.

“बहुजन वंचित आघाडीसाठी आमची दारं अजूनही खुली”

येत्या 15 तारखेला बहुजन वंचित आघाडीच्या सर्व 48 जागा जाहीर करणार असल्याचं भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. मात्र बहुजन वंचित आघाडीसाठी आमची दारे आणि खिडक्या अजून उघड्या आहेत. त्यांनी फेरविचार करावा आणि महाआघाडीत यावं अशी आपली जाहीर विनंती बाळासाहेबांना असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले. आम्ही अजूनही जागावाटपाबाबत निर्णय घेतला नाही. त्यांनी विचार करावा. बाळासाहेबांच्या भूमिकेमुळे शिवसेना-भाजपला फायदा होणार आहे. शिवसेना-भाजप विरोधात लढायचं असेल आणि त्यांचा फायदा होऊ द्यायचा नसेल तर आंबेडकर यांनी थोडी नरमती भूमिका घ्यावी, असं अशोक चव्हाण म्हणाले.

“राजू शेट्टींना दोन जागा देणार”

राजू शेट्टी यांनी तीन जागांची काँग्रेस-राष्ट्रवादीकडे मागणी केली. पण त्यांना एकूण दोन जागा देण्याचं आम्ही मान्य केल्याचं अशोक चव्हाण म्हणाले. राजू शेट्टी आणि आपली याबाबतीत चर्चा झाली. राजू शेट्टींनी महाआघाडीत यावं यासाठी आपण आग्रही असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले.

नांदेडमधून काँग्रेसचा उमेदवार कोण?

अशोक चव्हाण यांच्या नांदेडमधून लोकसभा कोण लढणार याबाबत अजून उत्सुकता आहे. अशोक चव्हाण यांच्या जागी त्यांच्या पत्नी आमदार अमिता चव्हाण यांनी लोकसभा लढवावी अशी एकमुखी मागणी जिल्हा काँगेसने केली. मध्यतंरी नांदेडमध्ये आलेल्या पक्ष निरीक्षकाकडे देखील काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमेव अमिता चव्हाण यांच्या उमेदवारीची मागणी केली. मात्र नांदेडचा उमेदवार अजून ठरला नसल्याचं अशोक चव्हाण म्हणाले. पक्षाने सांगितले तर मला लोकसभा लढवावी लागेल, असं अशोक चव्हाण म्हणाले. स्वतःच्या उमेदवारीचे संकेत देऊन त्यांनी संभ्रम कायम ठेवला.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.