AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादेतील ‘म्हाडा’च्या 864 घरांची लॉटरी, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूरसाठी आव्हाडांची राज्य सरकारकडे मागणी

औरंगाबादेतील म्हाडाच्या 864 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली. या घरांसाठी एकूण 8 हजार 226 अर्ज दाखल झाले होते. म्हणजे एका घरामागे जवळपास 10 अर्ज करण्यात आले होते.

औरंगाबादेतील 'म्हाडा'च्या 864 घरांची लॉटरी, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूरसाठी आव्हाडांची राज्य सरकारकडे मागणी
जितेंद्र आव्हाड
| Edited By: sagar joshi | Updated on: Jun 10, 2021 | 4:02 PM
Share

औरंगाबाद : गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ऑनलाईन उपस्थितीत औरंगाबादेतील म्हाडाच्या 864 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली. या घरांसाठी एकूण 8 हजार 226 अर्ज दाखल झाले होते. म्हणजे एका घरामागे जवळपास 10 अर्ज करण्यात आले होते. यावरुन म्हाडावर लोकांचा विश्वास दिसत असल्याची प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय. राज्य सरकारनं पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या शहरात म्हाडाला जागा उपलब्ध करुन द्यावा. जेणेकरुन तिथे सर्वसामान्य नागरिकांसाठी घरं बांधता येतील अशी मागणीही यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी सरकारकडे केलीय. (MHADA houses Lottery for 864 houses of MHADA in Aurangabad)

त्याचबरोबर, नव्या गृहनिर्माण धोरणात आम्ही मुंबईलगत ज्या बिल्डरांच्या जमिनी आहेत, त्यांच्यासोबत संयुक्त करार करुन म्हाडा घरं उपलब्ध करुन देणार असल्याचंही यावेळी आव्हाड यांनी सांगितलं. आव्हाड यांनी ऑनलाईन उपस्थिती लावत आज औरंगाबादेतील 864 घरांची लॉटरी काढली. त्यावेळी ते बोलत होते. औरंगाबाद मंडळातर्फे हिंगोली इथं प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 132, म्हाडा गृहनिर्माण योजनेंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 48, पडेगाव-औरंगाबाद येथील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 368 सदनिका व म्हाडा गृहनिर्माण योजनेंतर्गत मध्यम उत्पन्न गटातील 168 सदनिका व औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतील 20 टक्के सर्व समावेश योजनेंतर्गत मध्यम उत्पन्न गटातील 148 सदनिका अशा विविध उत्पन्न गटांतील एकूण 864 सदनिकांची सोडत आज पार पडली.

दिव्यांगांसाठी आव्हाडांची मोठी घोषणा

मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांच्या यादीत दिव्यांग व्यक्तींचा समावेश आहे. याबाबत त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. म्हाडाच्या लॉटरीमध्ये ५ टक्के घरे दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. तशी घोषणाच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तीन दिवसांपूर्वी केलीय. मुंबईत हक्काचं घर असावं, यासाठी अनेक जण प्रयत्न करतात. गृहनिर्माण मंत्रालयाच्या म्हाडा तर्फे उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पातील ५ टक्के घरं दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात निर्माण होणाऱ्या सर्व प्रकल्पांसाठी हा निर्णय लागू असणार आहे, अशी माहिती आव्हाड यांनी ट्विट करून दिली.

संबंधित बातम्या :

ठाकरे-मोदी भेटीवर शरद पवार पहिल्यांदाच बोलले, महाविकास आघाडीबाबतही मोठं भाकीत

परळीच्या सिरसाळा येथे अखेर एमआयडीसी होणार, उद्योग विभागाची मंजुरी; राज्य सरकारचा मोठा निर्णय

MHADA houses Lottery for 864 houses of MHADA in Aurangabad

Follow Us
तो कोण कुरळ्या केसांचा बाबा... राज ठाकरेंनी रावणाचा किस्सा सांगताच...
तो कोण कुरळ्या केसांचा बाबा... राज ठाकरेंनी किस्सा सांगिताच हशा पिकला, मेळाव्यातील लोकं...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं पु्न्हा मोठं विधान; थेट म्हणाले...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं पु्न्हा मोठं विधान; थेट म्हणाले, न्यायप्रक्रियेतील गती...
भाजपऐवजी चक्क काँग्रेसचा उल्लेख; भरमंचावर भाजप खासदाराचे वक्तव्य चुकलं
भाजपऐवजी चक्क काँग्रेसचा उल्लेख; भरमंचावर भाजप खासदाराचे वक्तव्य चुकलं, स्वतःच्याच मुलाला...
विद्यानंद बापट यांच्यावरील हल्लाबाबत सुळेंची सर्वात मोठी प्रतिक्रिया;
Supriya Sule | विद्यानंद बापट यांच्यावरील हल्लाबाबत सुळेंची सर्वात मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाल्या...
सरकार पडल्यानंतर सर्वात आधी हा नेताच पक्ष सोडणार; बड्या नेत्याच्या...
सरकार पडल्यानंतर सर्वात आधी हा नेताच पक्ष सोडणार; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
जरांगेंच्या उपोषणाचा आज नववा दिवस; तब्येत आणखी खालावली, मात्र...
Manoj Jarange Patil | जरांगेंच्या उपोषणाचा आज नववा दिवस; तब्येत आणखी खालावली, मात्र...
बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्याचा सत्कार; चांदीचे कडं देऊन...
बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्याचा सत्कार; चांदीचे कडं देऊन... संग्राम भंडारेंनी केली अजब घोषणा
काँग्रेस पक्षाला मोठा धक्का! झारखंड सरकारमधील बड्या मंत्र्याचे निधन,
काँग्रेस पक्षाला मोठा धक्का! झारखंड सरकारमधील बड्या मंत्र्याचे निधन, कारण...
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य