AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अतिवृष्टीमुळे शेतीचं अतोनात नुकसान, औरंगाबादेत तरुण शेतकऱ्याचा गळफास

औरंगाबादेतील एका तरुण शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे आत्महत्या केली आहे. यामुळे गावात शोककळा पसरली आहे. (Aurangabad Young Farmer Suicide)

अतिवृष्टीमुळे शेतीचं अतोनात नुकसान, औरंगाबादेत तरुण शेतकऱ्याचा गळफास
| Updated on: Sep 24, 2020 | 9:19 AM
Share

औरंगाबाद : औरंगाबादेतील एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झाल्याने त्याने आत्महत्या केली. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील वाकी गावात ही घटना घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. (Aurangabad Young Farmer Suicide)

सुरेश रावसाहेब जंजाळ असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. 37 वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झाल्याने आत्महत्या केली आहे. काल (23 सप्टेंबर) दुपारी 2 वाजता त्याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.

अनेक भागातील शेतकरी चिंताग्रस्त 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत पाऊस कोसळत आहे. त्यामुळे गावोगावी शेतीचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या हात तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

गेल्या वर्षी पडलेला दुष्काळ, यंदा सततचा पाऊस यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. काही शेतकरी नापिकीला तर काही जण बँकेतील कर्ज फेडण्याची चिंता आहे. त्यात शेतमालालाही योग्य तो भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळलं असताना मार्चमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु झाला. त्यामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले. तसेच अनेक पिकांवर रोगाचा प्रादुर्भावही वाढला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.(Aurangabad Young Farmer Suicide)

संबंधित बातम्या : 

काटेकोर इशारा, बिनचूक अंदाज, श्रेयापासून वंचित हवामान विभाग

कुटुंबात गृहिणीचं काम आव्हानात्मक, पण कौतुक नाही, कोर्टाने घेतली ‘तिची’ दखल

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.