AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde | शिंदे सरकारचा दणका, औरंगाबादचा 500 कोटींचा निधी थांबला, पालकमंत्री मिळाल्यावरच पुढचा निर्णय!

एकनाथ शिंदे सरकारमधील नवीन निर्णयानुसार, औरंगाबादचं पालकमंत्री पद कुणाकडे येणार, याच्या चर्चा सध्या रंगू लागल्यात. बंडखोर शिंदेसेनेसाठी औरंगाबादमधील आमदारांचं मन वळण्यासाठी मोठी भूमिका घेतलेले औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांना पालकमंत्री पद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Eknath Shinde | शिंदे सरकारचा दणका, औरंगाबादचा 500 कोटींचा निधी थांबला, पालकमंत्री मिळाल्यावरच पुढचा निर्णय!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
| Edited By: | Updated on: Jul 05, 2022 | 10:50 AM
Share

औरंगाबादः राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं सरकार नुकतंच सक्रिय झालं आहे. त्यामुळे मागील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या काळात नियोजन विभागाने औरंगाबादसाठी (Aurangabad) मंजूर केलेल्या अनुदानावरच टाच आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या सरकारने 04 जुलै रोजी संध्याकाळी एक परिपत्रक काढले. त्यात प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांना स्थगिती देऊन फेरआढावा घेण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादचा 500 कोटींचा निधीही या आदेशामुळे थांबला आहे. यात औरंगाबाद शहराचा नियमित 325 कोटींचा तसेच सुधारीत 175 कोटी असा सर्व 500 कोटी रुपयांचा निधी मिळणार होता. त्यामुळे आराखड्यातील प्रशासकीय मान्यता दिलेली आणि निधीसाठी शिफारस केलेली सर्व कामे आता खोळंबली आहेत. शिंदे सरकारचे खातेवाटप झाल्यावर औरंगाबादला कोणता पालकमंत्री होणार यावर सदर निधी कितपत मंजूर होईल, याचा निर्णय घेतला जाईल.

लवकरच पालकमंत्री मिळणार…

नव्या एकनाथ शिंदे सरकारमध्ये पालकमंत्र्यांची तसेच नियोजन समितीतील नियुक्ती लवकरच होणार आहे. नियोजन समितीवर नवीन सदस्य आमि विशेष निमंत्रिकांची नेमणूक होणार असल्याने 1 एप्रिलपासून आजवर दिलेल्या विविध योजनेअंतर्गत काांना दिलेल्या प्रशासकीय मान्यतांना स्थगिती देण्यात आली आहे. पालकमंत्री नियुक्त झाल्यानंतर त्यांच्यासमोर सर्व कामांची यादी सादर करून ती कामं सुरु ठेवायची की थांबवायची याचा निर्णय होईल, असे नियोजन विभागाने पत्रात म्हटले आहे.

3 कोटींची कामं खोळंबली

औरंगाबाद जिल्ह्यात जवळपास 3 कोटी 19 लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यात नावीन्यपूर्ण योजनेसाठी 9 लाख 76 हजार, वैजापूर तालुक्यात कोल्हापुरी बंधाऱ्यासाठी 2 कोटी 84 लाख, अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी 10 लाख, 24 लाख 27 हजार रुपयांचा निधी कन्नड, पैठण, औरंगाबादमध्ये ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी मंजूर करण्यात आला होता. आता नवे पालकमंत्री नियुक्त होईपर्यंत ही कामे खोळंबणार आहेत.

संजय शिरसाट पालकमंत्री?

एकनाथ शिंदे सरकारमधील नवीन निर्णयानुसार, औरंगाबादचं पालकमंत्री पद कुणाकडे येणार, याच्या चर्चा सध्या रंगू लागल्यात. बंडखोर शिंदेसेनेसाठी औरंगाबादमधील आमदारांचं मन वळण्यासाठी मोठी भूमिका घेतलेले औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांना पालकमंत्री पद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपदेखील शिवसेनेचा हा गडही काबीज करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे औरंगाबादला भाजपचा पालकमंत्री मिळेल का शिंदेसेनेचा, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.