AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ये झिरो अच्छा है… Aurangabad मध्ये दोन वर्षानंतर प्रथमच कोरोना रुग्णसंख्या शून्यावर, निर्बंधांचं काय?

रुग्णसंख्या घटली तरीही लसीकरण अपेक्षित उद्दिष्ट साध्य करत नसल्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी टास्क फोर्सची बैठक घेतली. यात महापालिकेचे प्रमुख अधिकारीही उपस्थित होते. यावेळी लसीकरण वाढवण्यासाठी लोकप्रतिनिधींची मदत घ्यायचे ठरले आहे.

ये झिरो अच्छा है... Aurangabad मध्ये दोन वर्षानंतर प्रथमच कोरोना रुग्णसंख्या शून्यावर, निर्बंधांचं काय?
Image Credit source: TV9
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Mar 22, 2022 | 10:58 AM
Share

औरंगाबादः मागील दोन वर्षांपासून औरंगाबाद जिल्ह्याने (Aurangabad district) कोरोनाच्या रुग्णसंख्येत अफाट वाढ आणि त्यानंतर हळू हळू घट अनुभवली. चांगली बातमी म्हणजे दोन वर्षात प्रथमच 21 मार्च रोजी औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी एकही कोरोनाचा रुग्ण (Corona Patients) आढळला नाही. 15 मार्च 2020 रोजी औरंगाबादमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 69 हजार 741 रुग्ण दाखल झाले असून 1 लाख 65 हजार 981 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत 3 हजार 732 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सोमवारी जिल्ह्यातील रुग्णांची संख्या शून्यावर आल्याबद्दल जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Sunil Chavan) यांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र यामुळे लसीकरणाकडे नागरिकांनी दुर्लक्ष करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

जिल्ह्यातील निर्बंधांचे काय?

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या सोमवारी शून्यावर येऊन ठेपली. तसेच मागील काही दिवसांमध्ये रुग्णांचे प्रमाणही अत्यंत कमी गणले गेले. तरीही राज्य शासनाने लावलेल्या निर्बंधांत कोणतीही शिथिलता देण्यात येणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळवले आहे. लसीचा पहिला डोस 90 टक्के आणि दुसरा डोस 70 टक्के लोकांनी घेतला तरच जिल्हा निर्बंधमुक्त होईल, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. आता रुग्ण संख्या कमी करण्यापेक्षा दुसरा डोस जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा, याकडेच लक्ष दिले जाईल. त्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली जाईल, असेही चव्हाण यांनी सांगितले.

निर्बंध उठण्यासाठी आणखी 12 % ची प्रतीक्षा

शहरात कोरोना लसीकरण न केलेल्या नागरिकांवर अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. लसीचे डोस न घेतलेल्यांना पेट्रोल, रेशन देऊ नये अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. मात्र नागरिकांकडून या मोहिमेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाहीये. आतापर्यंत केवळ 58 टक्के लोकांनीच दुसरा डोस घेतला आहे. यात आणखी 12% वाढ झाली तरच औरंगाबाद जिल्हा निर्बंधमुक्त होऊ शकेल.

जनजागृतीसाठी मोहीम हाती घेणार

रुग्णसंख्या घटली तरीही लसीकरण अपेक्षित उद्दिष्ट साध्य करत नसल्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी टास्क फोर्सची बैठक घेतली. यात महापालिकेचे प्रमुख अधिकारीही उपस्थित होते. यावेळी लसीकरण वाढवण्यासाठी लोकप्रतिनिधींची मदत घ्यायचे ठरले आहे. त्यामुळे विधिमंडळ, लोकसभेच्या अधिवेशनानंतर सर्व आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, इतर नेत्यांची मदत घेऊन जनजागृती केली जाईल. वॉर्ड, आरोग्य केंद्रनिहाय लसीकरणाची आकडेवारी, स्थिती लोकांना समजून सांगितली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

इतर बातम्या-

Viral : भल्यामोठ्या अजगराच्या अंगावर बसून खेळतोय चिमुकला, Video काढणाऱ्यावर संतापले लोक

राष्ट्रवादीच्या आमदाराला भर चौकात फटके मारायला पाहिजेत, मनसेच्या अमेय खोपकरांची टीका

Follow Us
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report.

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?.

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?

Nalasopara Crime : त्या बिल्डींगमध्ये सुरू होता भलताच प्रकार, टीप मिळताच पोलीसांनी टाकला छापा अन….

Nalasopara Crime : त्या बिल्डींगमध्ये सुरू होता भलताच प्रकार, टीप मिळताच पोलीसांनी टाकला छापा अन…