AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | तोंडावरचा मास्क काढला अन् CCTV नं टिपला, कुख्यात गुन्हेगार राजेंद्र भीमा चव्हाण प्रेयसीच्या घरातून पकडला

पाच दिवसांपूर्वी जवाहरनगर पोलीसांचे पथक पाच दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे पोहोचले. पप्पू सतत गावठी कट्टा बाळगतो, अशी माहिती पोलिसांना होती. त्यामुळे त्याला सावधानतेनेच पकडणे आवश्यक होते.

Aurangabad | तोंडावरचा मास्क काढला अन् CCTV नं टिपला, कुख्यात गुन्हेगार राजेंद्र भीमा चव्हाण प्रेयसीच्या घरातून पकडला
अवैद्यरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्यावर कारवाईImage Credit source: tv 9
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Mar 18, 2022 | 12:54 PM
Share

औरंगाबादः खून, दरोडा, मंगळसूत्र चोरी अशा प्रकारचे तब्बल 14 गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुन्हेगार  राजेंद्र भीमा चव्हाण अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. औरंगाबादच्या जवाहर नगर पोलीसांच्या (Aurangabad police) विशेष पथकाने त्याला बेड्या ठोकल्या. प्रेयसीला भेटण्यासाठी तो अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे गेला होता. पोलिसांनी अत्यंत शिताफीनं सापळा रचत त्याला अटक केली. कारण पप्पू  हा नेहमीच गावठी कट्टा बाळगून असतो, त्याला पकडणे एखाद्याच्या जीवावरही बेतू शकते, याची कल्पना पोलिसांना होती. त्यामुळेच अत्यंत सावधगिरी बाळगत सापळा रचून (police trap) पोलिसांनी त्याला बेलापूर येथून अटक केली.

सीसीटीव्हीच्या मदतीने सुगावा मिळाला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र भीमा चव्हाण ऊर्फ पप्पू (28) असं या आरोपीचं नाव असून शहानूरमिया दर्गा परिसरात 1 फेब्रुवारी रोजी आणि आकाशवाणीजवळ 10 मार्च रोजी पप्पूने साथीदारांसोबत मंगळसूत्र हिसकावले होते. जवाहरनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचे पथक या प्रकरणी तपास करीत होते. आकाशवाणीपासून शहराबाहेर जाईपर्यंत पोलिसांनी जवळपास 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासले. रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्हीमध्ये पप्पूच्या साथीदाराने मास्क काढला त्यावरून पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली. पोलीस पप्पूच्या फोन कॉलचाही अभ्यास करीत होते.

श्रीरामपूर येथून पकडला

दरम्यान, पाच दिवसांपूर्वी जवाहरनगर पोलीसांचे पथक पाच दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे पोहोचले. पप्पू सतत गावठी कट्टा बाळगतो, अशी माहिती पोलिसांना होती. त्यामुळे त्याला सावधानतेनेच पकडणे आवश्यक होते. पाचव्या दिवशी तो बेलापूर येथील प्रेयसीच्या घरात गेल्यानंतर पहाटेच्या सुमारास त्याला पकडले. त्याला ताब्यात घेताला प्रेयसीनेही मोठा गोंधळ घातल्याचे पोलिसांनी सांगितले. बुधवारी न्यायालयाने त्याला चार दिवसांची कोठडी सुनावली.

इतर बातम्या-

नाशिकमध्ये महाराष्ट्र राज्य मंगल कार्यालय, लॉन्स फेडरेशनची स्थापना; Corona संकटातून बाहेर काढण्यासाठी चर्चा

गोंदियामध्ये टाकाऊ वस्तूंपासून तयार केली पक्षांसाठी पाणपोई

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली