AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादच्या पाणीपुरवठा योजनेच्या गतीवर प्रश्नचिन्ह, भाजप रस्त्यावर उतरणार, डॉ. भागवत कराड यांचा इशारा

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या या योजनेचे काम पुढील वर्षभरात पूर्णत्वास येणे अपेक्षित होते. मात्र योजनेची कामं अत्यंत संथगतीनं सुरु आहेत. त्यामुळे भाजप नेते आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

औरंगाबादच्या पाणीपुरवठा योजनेच्या गतीवर प्रश्नचिन्ह, भाजप रस्त्यावर उतरणार, डॉ. भागवत कराड यांचा इशारा
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Feb 20, 2022 | 10:45 AM
Share

औरंगाबादः शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी औरंगाबाद महापालिकेच्या (Aurangabad municipal Corporation) वतीने 1680 कोटीच्या बजेटची पाणीपुरवठा योजना (Water supply scheme) राबवली जात आहे. मात्र या योजनेची कामं अत्यंत संथ गतीनं सुरु आहेत. योजनेच्या धीम्या गतीवर आजवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. आता याविरोधात भाजप नेते आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहरातल्या पाणीपुरवठा योजनेची गती वाढवा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा डॉ. भागवत कराड यांनी दिला आहे. आता यावर महापालिका आणि शिवसेना काय भूमिका घेते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काय आहे योजना?

औरंगाबादमध्ये डिसेंबर 2020 मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शहरातील नव्या पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन झाले. ही योजना पूर्ण करण्यासाठी तीन वर्षांची मुदत देण्यात आली आहे. सध्या औरंगाबाद शहराला जुन्या योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र अवाढव्य विस्तारलेल्या शहराला जुन्या योजनेचा पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. सध्या औरंगाबाद शहराला सहा ते आठ दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. नवी योजना कार्यान्वित झाल्यानंतर औरंगाबादकरांना 24 तास पाणीपुरवठा केला जाणार आहे. या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने 1680 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यातला 30 टक्के वाटा अर्थात 630 कोटी रुपये औरंगाबाद महापालिका भरणार आहे. तर 1 हजार 80 कोटी रुपये राज्य सरकार भरणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या राज्य सरकारच्या विभागाकडून या योजनेचं काम पूर्ण करणार आहे.

डॉ. भागवत कराड यांचा इशारा

दरम्यान, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या या योजनेचे काम पुढील वर्षभरात पूर्णत्वास येणे अपेक्षित होते. मात्र योजनेची कामं अत्यंत संथगतीनं सुरु आहेत. त्यामुळे भाजप नेते आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहरातील पाणीपुरवठा योजनेची कामं ज्या गतीने सुरु आहेत, ती पाहता दिलेल्या मुदतीत ती पूर्ण होतील, असं वाटत नाही. त्यामुळे नागरिकांना दररोज पाणी मिळावे, यासाठी आम्ही निश्चित आवाज उठवणार आहोत.योजनेचे काम वेगाने झाले नाही तर या मुद्द्यावरून आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शिवसेनेला धारेवर करण्यासाठी पाणीपुरवठा योजनेचा मुद्दा उचलून धरला जाणार आहे, त्याचेच हे संकेत आहेत.

इतर बातम्या-

Zodiac : ‘या’ 4 राशींसाठी पुढील पाच दिवस सुगीचे, अत्यंत महत्वाची कामे मार्गी लागतील आणि यश तुमच्या पदरामध्ये पडेल!

Nagpur Corona | नागपूर जिल्ह्यात आजपासून कोविड निर्बंध शिथिल, काय राहणार नवीन नियमावली?

Follow Us
चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित
Mumbai FDA : चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित; स्वच्छता निकषांचे उल्लंघन
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28...
Shivsena Hearing : सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28 वा मुद्दा सर्वात खास
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि...
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि... गुणरत्न सदावर्तेंची पत्रकार परिषद ऐकाच!
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर...
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर... सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेवर सुळे संतापल्या
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार अन्...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा खुलासा; कुटुंबाकडून हादरवणारी माहिती समोर
महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
बुलढाण्यात राजकीय वाद विकोपाला; महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच...
चालता येईना... जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच आला समोर
कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
बाळासाहेब म्हणाले होते, माझ्या पक्षाची काँग्रेस... कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला: अमित ठाकरेंच्या निषेधार्थ सभा तहकूब