AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | प्रसिद्ध ज्योतिर्लिंग घृष्णेश्वराचा गाभा 1 मार्चपासून खुला होणार, महाशिवरात्रीपासून दर्शनावरील निर्बंध हटणार

घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना येत्या 1 मार्चपासून गाभाऱ्यातील शिवलिंगाचे दर्शन घेता येणार असले तरीही कोरोना प्रतिबंधक लसीच्या नियमांचे पालन भाविकांना करावे लागणार आहे. ज्या नागरिकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जावा, अशा सक्तीच्या सूचना जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिल्या आहेत.

Aurangabad | प्रसिद्ध ज्योतिर्लिंग घृष्णेश्वराचा गाभा 1 मार्चपासून खुला होणार, महाशिवरात्रीपासून दर्शनावरील निर्बंध हटणार
प्रसिद्ध देवस्थान घृष्णेश्वर
| Updated on: Feb 22, 2022 | 3:35 PM
Share

औरंगाबादः कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic) तब्बल 23 महिन्यांपासून बंद असलेल्या वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिराचा गाभारा लवकरच भाविकांसाठी खुला होणार आहे. येत्या 1 मार्च पासून श्री घृष्णेश्वर मंदिराच्या (Ghrishneshwar Temple ) गाभाऱ्यापर्यंत जाऊन भाविकांना दर्शन घेता येणार आहे. 1 मार्च रोजी महाशिवरात्री (Mahashivratri) असून मराठवाड्यातील सर्व जिल्हे तसेच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाहून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. मात्र कोरोना निर्बंधामुळे यंदा तरी गाभाऱ्यापर्यंत जाऊन दर्शन घेता येईल की नाही, अशी चिंता भाविकांना होती. औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर या मंदिरावरील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन डोस घेतलेल्यांनाच दर्शन

घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना येत्या 1 मार्चपासून गाभाऱ्यातील शिवलिंगाचे दर्शन घेता येणार असले तरीही कोरोना प्रतिबंधक लसीच्या नियमांचे पालन भाविकांना करावे लागणार आहे. ज्या नागरिकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जावा, अशा सक्तीच्या सूचना जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिल्या आहेत. 1 मार्च रोजी महाशिवरात्र असून येथे मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. त्यानुसार, योग्य नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. तसेच मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाला मास्क घालणे बंधनकारक आहे.

23 महिन्यांपासून गाभाऱ्यातून दर्शन बंद होते…

देशात मार्च 2020 पासून कोरोना महामारीला सुरुवात झाली. तेव्हापासून देशभरातील सर्व धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली होती. ही प्रवेश बंदी तब्बल वर्षभर कायम होती. त्यानंतर निर्बंध शिथिल करीत शासनाने धार्मिक स्थळे भाविकांसाठी खुली केली. परंतु थेट गाभाऱ्यातून दर्शन घेण्यावरील बंदी कायम होती. यात बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असेलल्या वेरुळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिराचाही समावेश होता. भाविकांना तब्बल 23 महिन्यांपासून गाभाऱ्यातून दर्शनावर बंदी होती. आता जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले असून जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी मंदिराच्या विश्वस्तांशी संवाद साधून घृष्णेश्वर मंदिराचा गाभारा भाविकांच्या दर्शनासाठी खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 मार्चपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

इतर बातम्या

सोन्या-चांदीच्या भावात तेजी; जाणून घ्या आजचे दर

MahaInfra Conclave: मुंबई 2025 पर्यंत World Class City होईल, शाश्वत विकास हाच केंद्रबिंदू, MMR अधिकाऱ्यांचं आश्वासन!

Follow Us
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!.
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य.
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात.
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा.
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल.
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल.
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका.
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप.
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले.