Icc T20i World Cup 2026 : भारताचा फायनलमध्ये पोहचताच वर्ल्ड रेकॉर्ड, पाकिस्तान-ऑस्ट्रेलियाला पछाडलं
इंडिया यासह टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत सर्वाधिक वेळा पोहचणारी टीम ठरली. टीम इंडियाने यासह खास कामगिरी करुन दाखवली आहे.

Varun Arshdeep Axar And Suryakumar Yadav Team IndiaImage Credit source: Bcci x Account
टीम इंडियाने गुरुवारी 5 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडवर 7 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं. टीम इंडियाची ही टी 20i वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहचण्याची सलग दुसरी वेळ तर एकूण चौथी वेळ ठरली. इंडिया यासह टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत सर्वाधिक वेळा पोहचणारी टीम ठरली. टीम इंडियाने यासह खास कामगिरी करुन दाखवली आहे.
Follow Us
