AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादेत तीन दिवस घंटा गाडी येणार नाही! कचरा गोळा करणाऱ्यांची सामुहिक रजा, काय आहे कारण?

औरंगाबाद महापालिकेने शहरातील कचरा संकलन कामाचे दोन वर्षांपूर्वी खासगीकरण केले आहे. बंगळुरू येथील पी गोपीनाथ रेड्डी या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. मात्र शहरातील कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गेल्या काही वर्षांपासून किमान वेतनही मिळत नसल्याची तक्रार केली आहे

औरंगाबादेत तीन दिवस घंटा गाडी येणार नाही! कचरा गोळा करणाऱ्यांची सामुहिक रजा, काय आहे कारण?
औरंगाबाद महापालिकेच्या वतीने घंटागाडीद्वारे कचरा संकलन केले जाते. Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Feb 14, 2022 | 3:35 PM
Share

औरंगाबादः शहरातील कचरा गोळा (Garbage collectors) करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सामुहिक रजा घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे औरंगाबादकरांची कोंडी (Aurangabad Waste management) होण्याची शक्यता आहे. या कर्मचाऱ्यांचे किमान वेतन न मिळाल्याने एकाच वेळी सर्वांनी रजेवर जाण्याचा निर्णय या संकलकांनी घेतला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस म्हणजे 14, 15, 16 फेब्रुवारी या तीन दिवसांमध्ये शहरातील कोणत्याही भागातून कोणत्याही प्रकारचा कचरा उचलला जाणार नाही, अशी सूचना या कर्मचार्यांच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे औरंगाबादच्या नागरिकांना (Aurangabad) कर्मचाऱ्यांच्या या सामुहिक रजेचा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

कुणी थकवले वेतन?

औरंगाबाद महापालिकेने शहरातील कचरा संकलन कामाचे दोन वर्षांपूर्वी खासगीकरण केले आहे. बंगळुरू येथील पी गोपीनाथ रेड्डी या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. मात्र शहरातील कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गेल्या काही वर्षांपासून किमान वेतनही मिळत नसल्याची तक्रार केली आहे. तसेच किमान वेतनासह गणवेश, गमबूट, आणि कचरा उचलण्यासाठीच्या इतर सुविधा देण्यात याव्यात, ही कचरा संकलकांची मागणी आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासन तसेच रेड्डी कंपनीला अनेकदा पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. मात्र या मागण्यांकडे गंभीरतेने घेत नसल्याचे दिसून येते. शहरात सध्या जवळपास 900 कर्मचाऱ्यांकडून कचना उचलण्यात येतो. यात काही कचरा संकलक, ड्रायव्हर आमि सुपरवायजर आहेत.

कचऱ्याचे ढीग लागण्याची शक्यता

दरम्यान, रेड्डी कंपनीकडे वारंवार विनवणी करूनही व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे पुढील तीन दिवस म्हणजे 14,15 आणि 16 फेब्रुवारी हे तीन दिवस शहरातील कचरा संकलपक, घंटागाडी कर्मचारी हे सामूहिक रजेवर जाणार आहेत. शहरात दररोज अनेक टन कटरा गोळा केला जातो. त्यामुळे येत्या तीन दिवसात शहरातील कोणत्याही भागातून कचरा संकलित केला जाणार नाही, त्यामुळे कचऱ्याचे ढीग लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर  गल्लोगल्ली फिरणाऱ्या कचरा घंटागाडीवर तीन दिवस सामूहिक रजा असलेल्या आंदोलनाचे पोस्टर लावण्यात आले आहे.

इतर बातम्या-

Jhund first Song : अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’चं पहिलं गाणं रिलीज, तीन तासात तीन लाखांपार

कुडाळमध्ये कमाल! 17 पैकी 8 जागांवर भाजप, 7 जागा शिवसेनेला, तरी नगराध्यक्षपद मात्र काँग्रेसकडे

Follow Us
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती.....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू....
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर.
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले.....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.