AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | रखडलेल्या घरकुल योजनेसाठी आता मनपाची कसरत, आत्ता कुठे जमीन मिळाली, 31 मार्च पर्यंतच मुदत!

जिल्हा प्रशासनाने आधी 19 हेक्टर आणि नंतर 86 हेक्टर जमीन उपलब्ध करून दिली. मात्र, योजनेसाठी केंद्र शासनाने 31 मार्च पर्यंतचीच मुदत ठेवली आहे. त्यामुळे या मुदतीच महापालिकेला विकसक नियुक्त करणे आवश्यक आहे.

Aurangabad | रखडलेल्या घरकुल योजनेसाठी आता मनपाची कसरत, आत्ता कुठे जमीन मिळाली, 31 मार्च पर्यंतच मुदत!
औरंगाबाद महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय
| Updated on: Mar 03, 2022 | 3:00 AM
Share

औरंगाबादः केंद्र शासनाने पंतप्रधान आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी 31 मार्च पर्यंतची मुदत दिली आहे. मात्र औरंगाबादेत (Aurangabad Gharkul Scheme) ही योजना आधीपासूनच रखडली आहे. मागील महिन्यात खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) यांनी याविरोधात आवाज उठवल्यानंतर शहरातील या घरकुल योजनेसाठी महापालिकेला (Aurangabad municipal Corporation) राज्य शासनाकडून 105 हेक्टर जमीन देण्यात आली आहे. आता योजनेची मुदत संपण्यासाठी 1 महिनाच शिल्लक असताना एवढी मोठी प्रक्रिया कशी पार पाडायची, असा प्रश्न महापालिकेसमोर आहे.

15 मार्च पर्यंत शासनाला डीपीआर सादर करणार-प्रशासक

मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले की, प्रकल्पा सल्लागार संस्था अर्थात पीएमसी नियुक्तीसाठी महापालिकेने तातडीने अल्पमुदतीची निविदा काढली आहे. पीएमसी नियुक्त करण्याची निविदा 7 मार्चपर्यंत अंतिम केली जाईल. त्यानंतर पीएमसी घरकुल बांधण्यासाठी डीपीआर तयार करण्यासाठी एजन्सी नियुक्त करेल. हा डीपीआर तयार करुन 15 मार्चपर्यंत सादर करण्याची सूचना दिली जाणार आहे. म्हणजेच औरंगाबादमधील घरकुल योजनेचा डीपीआर राज्य शासनाकडे 15 मार्चपर्यंत सादर केला जाईल, असे प्रशासकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

औरंगाबादमध्ये का रखडली योजना?

2016 साली पंतप्रधान आवास योजनेसाठी शहरवासियांकडून घरकुल योजनेकरिता अर्ज मागवण्यात आले होते. स्वतःचे पक्के घर नसलेल्या 80 हजार लोकांनी मनपाकडे अर्ज सादर केले होते. छाननीअंती त्यातील 52 हजार अर्ज पात्र ठरले. नंतर परवडणारी घरे बांधण्यासाठी महापालिकेला जागाच उपलब्ध झाली नाहीत. त्यामुळे आतापर्यंत ही योजना थंड बस्त्यात राहिली. याविरोधात मागील महिन्यात खासदार इम्तियाज जलील यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर संसदेच्या स्थायी समितीने त्याची दखल घेत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्लीला पाचावरण केले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने आधी 19 हेक्टर आणि नंतर 86 हेक्टर जमीन उपलब्ध करून दिली. मात्र, योजनेसाठी केंद्र शासनाने 31 मार्च पर्यंतचीच मुदत ठेवली आहे. त्यामुळे या मुदतीच महापालिकेला विकसक नियुक्त करणे आवश्यक आहे.

इतर बातम्या-

Nashik | गाडगेबाबांच्या धर्मशाळेत 85 वर्षांपासून अविरत अन्नछत्र; वंचिताचा अनोखा आधारवड!

उस्मानाबादची कराटे पटू, ऑलिंपिक सुवर्णपदक विजेती प्रणितावर उपासमारीची वेळ, राज ठाकरेंनी घेतले पालकत्व!

Follow Us
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा.