AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | हायकोर्टाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या मशिदींचे भोंगे तोडले पाहिजेत, करणी सेनाअध्यक्षांचे औरंगाबादेत वक्तव्य

महाराष्ट्र करणी सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे महासंमेलन औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आले होते. यात जवळपास 30 जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. या संमेलनानंतर सुरजपाल अम्मू यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Aurangabad | हायकोर्टाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या मशिदींचे भोंगे तोडले पाहिजेत, करणी सेनाअध्यक्षांचे औरंगाबादेत वक्तव्य
करणी सेनेचे अध्यक्ष सूरजपाल अम्मू यांचे वक्तव्य Image Credit source: TV9 Marathi
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Apr 11, 2022 | 2:49 PM
Share

औरंगाबाद | रात्री दहा वाजेनंतर भोंगे वाजवू नये, असा हायकोर्टाचा आदेश असताना जिथे जिथे भोंगे वाजतील, ते भोंगे तोडून टाकण्याचे आदेश करणी सेनेचे (Karani Sena) अध्यक्षांनी दिले आहेत. करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरजपाल अम्मू (SurajPal Ammu) यांनी औरंगाबादमध्ये (Aurangabad city) हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. न्यायालयाचा निर्णय हा सर्वांसाठी बंधनकारक आहे, असे ते म्हणाले. एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात करणी सेनेचे महासंमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष देविचंदसिंह बारवाल, माजी खासदार उत्तमसिंह पवार, आमदार अंबादास दानवे, शिवचैतन्य महाराज, आमदार उदयसिंग राजपूत, करणी सेनेच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा राखी गर्ग, प्रदेशच्या अॅड. संध्या राजपूत, बादलसिंग तवर, अमिता शेखावत, पंकजसिंह ठाकूर, बाबा ठाकूर, बाबा परदेशी, मधुकर ढोमसे, सुभाष राठौर, दिनेश राजपूत आदींची उपस्थिती होती.

काय म्हणाले करणी सेनेचे अध्यक्ष?

महाराष्ट्र करणी सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे महासंमेलन औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आले होते. यात जवळपास 30 जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. या संमेलनानंतर सुरजपाल अम्मू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘ मी देशातील सर्व राज्यांमध्ये जात आहे. जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, हरियाण, चंदीगड, पंजाब, हिमाचल, राजस्थानातही जाणार आहे. परवा मी मध्यप्रदेशातल्या भोपाळमध्ये होतो. आज महाराष्ट्रात आहे. ज्या प्रकारे हायकोर्टाचे आदेश आल्यानंतरही आजही मशीदीत लाऊडस्पीकरचा दुरुपयोग होत आहे. करणी सेनेच्या कार्यकर्त्यांना मी आदेश दिले आहेत की जे हायकोर्टाचा आदेश पाळणार नाहीत, जिथे जिथे तुम्हाला वाटेल, ते कायद्याचे उल्लंघन करत आहेत, त्या माइकला तोडायला उशीर करू नका. कुणाला कायदेशीर कारवाई करायची असेल करु द्या. आम्ही सामोरं जाण्यासाठी तयार आहोत, असं वक्तव्य करणी सेनेच्या अध्यक्षांनी केलं.

लोकसंख्या नियंत्रण कायदा बनवण्याचा उद्देश

हिंदू जनजागरण समितीचे एक उद्दिष्ट सांगताना सुरजपाल अम्मू म्हणाले, लोकसंख्या नियंत्रण कायदा बनणे हा आमचा उद्देश आहे. मोदी सरकारला आम्ही असा प्रस्ताव दिला आहे. हम दो हमारे दो… हा कायदा सर्वांसाठी झाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. ज्या प्रकारे एकाच धर्माची लोकसंख्या वाढत आहे, त्याला करणी सेनेचा विरोध आहे. कुणाला वाईट वाटले तरी वाटू द्या. या देशात एकच कायदा असावा. कॉमन सिव्हिल कोड लागू झाला पाहिजे. आर्थिक आधारावर आरक्षण लागू झाले पाहिजे, अशीही करणी सेनेची मागणी आहे.

इतर बातम्या-

Aurangabad | औरंगाबाद-पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणाचे वारे आले… नि भर उन्हाळ्यात फळबागा फुलल्या, गुपित काय?

कार घ्यायचीयं पण ग्राउंड क्लिअरन्सचं काय? अखेर प्रतीक्षा संपली!, जाणून घ्या ‘या’ पाच कारची माहिती…

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली