AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | एकतर्फी प्रेमातून मित्राची हत्या, औरंगाबादेत आरोपीला जन्मठेप, 50 हजारांचा दंड

दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने मंगेश वायवळ याला दोषी ठरवून जन्मठेप व 50 हजारांचा दंड ही शिक्षा सुनावली.

Aurangabad | एकतर्फी प्रेमातून मित्राची हत्या, औरंगाबादेत आरोपीला जन्मठेप, 50 हजारांचा दंड
महिला पोलीस कॉन्स्टेबलला थप्पड मारणारी महिला निर्दोषमुक्तImage Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Apr 09, 2022 | 4:21 PM
Share

औरंगाबाद | एकतर्फी प्रेमातून निर्माण झालेल्या वादानंतर जिवलग मित्राचा गळा दाबून खून (Murder) करणाऱ्या आरोपीला जन्मठेप (Life Imprisonment) आणि 50 हजार रुये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा दंड न भरल्यास दोन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षाही  ठोठावण्यात आली आहे. औरंगाबाद येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायमूर्ती एस. जे. रामगडिया यांनी शुक्रवारी हा निकाल दिला. या दंडाची रक्कम नुकसान भरपाई म्हणून मृताचे वडील तथा फिर्यादी यांना देण्याचे न्यायालयाच्या (Aurangabad court) आदेशात नमूद करण्यात आले आहे. मंगेश सुदाम वायवळ असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. तो परभणी येथील समसापूर येथील 27 वर्षीय तरूण आहे. मंगेशच्या विरोधात मृत अजय तिडके याचे वडील शत्रुघ्न तिकडे यांनी फिर्याद नोंदवली होती. अजय हा बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील शहापूरचा रहिवासी होता.

काय आहे नेमके प्रकरण?

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, अजय आणि मंगेश 2017 पासून जिवलग मित्र होते. एनएसएस कँप दरम्यान अजयची एका तरुणीशी ओळख झाली होती. त्यांच्यात प्रेम बहरले.  अजयने मंगेशला ही माहिती सांगितली. दरम्यान, अजयच्या प्रेयसीवरच मंगेशचे एकतर्फी प्रेम जडले. घटनेच्या काही महिन्यांपूर्वी मंगेश पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी गेला होता. 31 मार्च 2018 रोजी मंगेश पुण्याहून शहरात आला. 3 एप्रिल 2018 रोजी तो अजयच्या खोलीत मुक्कामासाठी गेला. 4 एप्रिल 2018 रोजी भीमयंती उत्सवानिमित्त विद्यापीठात गायनाच्या कार्यक्रमासाठी अजय हा रुम पार्टनर अनिल भोजने आणि सचिन वानखेडे यांच्यासोबत गेला. मंगेश अजयच्या रुममध्येच झोपला होता. रात्री साडेअकरा वाजता अजय आमि त्याचे मित्र रुममध्ये आले. त्यावेळी मंगेशने अजयशी खासगी बोलायचे आहे, असे सांगत सचिन आणि अनिलला दुसऱ्या खोलीत पाठवले. दुसऱ्या दिवशी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास मंगेशने सचिन आणि अनिलला उठवून प्रेमात अडसर ठरत असल्याने आपण अजयचा गेम केल्याचे सांगितले. तसेच आपण पोलीस ठाण्यात जात असल्याचे सांगून तिथून निघून गेला.

रुमपार्टनर व डॉक्टरांचा जबाब महत्त्वाचा

दरम्यान, या प्रकरणी पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सहाय्यक सरकारी लोकभियोक्त अजित अंकुश यांनी नऊ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यात मृताच्या रुमपार्टनरसह डॉक्टरांचा जबाब महत्त्वाचा ठरला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने मंगेश वायवळ याला दोषी ठरवून जन्मठेप व 50 हजारांचा दंड ही शिक्षा सुनावली.

इतर बातम्या-

Vadodara: गुजराती ड्रामा अर्टिस्ट प्राची मौर्य हत्या प्रकरणी बॉयफ्रेंडला जन्मठेपेची शिक्षा

Video : कालचा हल्ला हा संजय राऊतांनीच नियोजनबद्ध केलाय का?-प्रवीण दरेकर

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.