Aurangabad | लग्नानंतर फिरायला गेली अन् दागिन्यांसह पसार झाली, औरंगाबादेत नवरदेवाची फसवणूक

तुम्ही किल्ल्यात जाण्यासाठी तिकिटे काढा, मी काही खाण्याचे पदार्थ आणते, असे तिने सांगितले. बराच वेळ झाला शुभांगी परत येत नसल्याने राजेश मुख्य रस्त्याकडे आला. तेथील दुकानदारांना विचारपूस केली असता ती एका बोलेरो गाडीत बसून गेल्याचे काही जणांनी सांगितले. नंतर राजेशने दौलताबाद पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.

Aurangabad | लग्नानंतर फिरायला गेली अन् दागिन्यांसह पसार झाली, औरंगाबादेत नवरदेवाची फसवणूक
नुकतीच विवाहित झालेली वधू दागिन्यांसह पसार
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 1:26 PM

औरंगाबादः तीन दिवसांपूर्वी लग्न (Marriage) झाले. नवरा-बायको सासरची मंडळी खुश होती. लग्नानंतर नवरा आणि बायको फिरायला म्हणून दौलताबाद किल्ल्यावर (Daulatabad Fort) गेले. एवढ्यात मी नवऱ्याची नजर चुकवून नववधू तेथून पसार झाली. नुकतेच लग्न झालेले असल्याने सर्वच दागिने या पत्नीच्या अंगावर होते. या दागिन्यांसह तिने दौलताबाद परिसरातून कारमधून धूम ठोकली. या महिलेच्या अंगावर 70 हजार रुपये किंमतीचे दागिने होते. 29 मार्च रोजी सदर महिला पसार झाली. त्यानंतर नुकताच विविहित झालेला पती आणि सासरच्या मंडळींना प्रचंड धक्का बसला. अखेर या प्रकरणी पोलिसात (Aurangabad police) तक्रार दाखल करण्यात आली. दौलताबाद पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. हे लग्न जुळवण्यासाठी आणि लग्न पार पडेपर्यंत राजेशला मोठा खर्च करावा लागला होता.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणी सविस्तर माहिती अशी की, खुलताबाद तालुक्यातील मावसाळा येथे राहणारा राजेश प्रकाश लाटे हा तरुण लग्नासाठी वधूच्या शोधात होता. राजेश वाळूज येथे एका कंपनीत काम करतो. काही दिवसांपूर्वी त्याची जळगाव जिल्ह्यातील बबन म्हस्के याच्याशी ओळख झाली. या मध्यस्थाच्या ओळखीतून एक मुलगी लग्नासाठी तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर बबन म्हस्के याने त्याची ओळख अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील आशाबाई भोरे (नवरीची मावशी) यांच्याशी करून दिली. या दोघांच्या मध्यस्थीने जळगाव जिल्ह्यातील प्रभाकर शिंदे यांची मुलगी शुभांगीसोबत राजेश लाटे याचा विवाह ठरला. यासाठी त्याला मुलीच्या नातेवाईकांना 1 लाख 30 हजार रुपये द्यावे लागले. सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर शुभांगीशी 26 मार्च 2022 रोजी राजेशने दौलताबाद येथील दत्तमंदिरात मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न पार पाडले.

दौलताबाद किल्ला पहायला गेली अन् पसार झाली

दरम्यान, राजेशने शुभांगीच्या अंगावर 70 हजार रुपये किंमतीचे दागिने घातले गोते. तसेच लग्नाचा संपूर्ण खर्चही केला होता. चांगली पत्नी मिळाल्याने सासरच्या मंडळींसह राजेशदेखील आनंदी होता. 27 मार्च रोजी हे जोडपे देवदर्शन करून आले. त्यानंतर 29 मार्च रोजी सत्यनारायणाची महापूजा झाल्यानंतर हे दोघे देवगिरी किल्ला पाहण्यासाठी गेले. तेथे गेल्यावर तुम्ही किल्ल्यात जाण्यासाठी तिकिटे काढा, मी काही खाण्याचे पदार्थ आणते, असे तिने सांगितले. बराच वेळ झाला शुभांगी परत येत नसल्याने राजेश मुख्य रस्त्याकडे आला. तेथील दुकानदारांना विचारपूस केली असता ती एका बोलेरो गाडीत बसून गेल्याचे काही जणांनी सांगितले. नंतर राजेशने दौलताबाद पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.

इतर बातम्या-

Video : मोराने रस्त्यात पिसारा फुलवला, 20 सेकंदाच्या व्हीडिओला चार लाख लोकांची पसंती…, एकदा बघाच

Ranbir Alia Wedding: रणबीर-आलियाच्या लग्नावरील हे भन्नाट मीम्स एकदा पहाच; पोट धरून हसाल!

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.