AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | शहरात अघोषित लोडशेडिंग, भर उन्हाळ्यात अन् सणासुदीत जनतेला त्रास देऊ नये, मनसेचा इशारा!

सध्या काही ठिकाणी जनतेला लोडशेडिंगचा सामना करावा लागत असला तरीही महाराष्ट्रावर हे लोडशेडिंगचं संकट कदापि येऊ देणार नाही, असं आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलं आहे. 

Aurangabad | शहरात अघोषित लोडशेडिंग, भर उन्हाळ्यात अन् सणासुदीत जनतेला त्रास देऊ नये, मनसेचा इशारा!
औरंगाबाद मनसेचे महावितरणला निवेदन Image Credit source: TV9 Marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Apr 08, 2022 | 6:18 PM
Share

औरंगाबाद: शहरात मार्च महिन्यापासूनच उन्हाचा कडाका (Summer temperature) वाढला असून सध्या औरंगाबादचे तापमान चाळीशीच्या पार पोहोचले आहे. त्यातच महावितरणतर्फे (MSEDCL) शहरातील अनेक भागांमध्ये अघोषित भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे शहरवासियांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शहरातील अनेक भागांमध्ये गेल्या आठवड्यापासून वीजपुरवठा (Electricity) खंडित केला जात आहे. त्यामुळे नागरिक घामाघूम होत आहेत. महावितरणच्या कार्यालयात नागरिकांचे फोन धडकत असून त्यांना समाधानकारक उत्तरे मिळत नाहीयेत, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. मनसेच्या कार्यालयातही लोकांनी आपल्या व्यथा मांडल्या असून ऐन उन्हाळा आणि सणासुदीच्या दिवसात नागरिकांना त्रास देऊ नये, असा इशारा औरंगाबाद मनसेतर्फे देण्यात आला.

मनसेचे महावितरणला निवेदन

मनसेचे शहराध्यक्ष सुमित खांबेकर यांच्या नेतृत्वात मनसे कार्यकर्त्यांनी आज महावितरणच्या कार्यालयाला यासंबंधीचे निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी म्हटलंय की, सध्या सर्व ठिकाणी अघोषित लोड शेडिंग सुरू झाली आहे, कालपासून मनसेच्या कार्यालयावर लोकांनी येऊन व्यथा मांडल्या आहेत, सर्व सामान्य जनतेचे सण तोंडावर आहेत. रामनवमी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, हनुमान जन्मोत्सव, ईद सर्वच सण तोंडावर आहेत. अश्या परिस्थितीत जनतेस त्रास देऊ नये, भारनियमन करू नये, अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे. तसेच या विनंतीनंतरही भारनियमन झाले तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला आहे.

तीन गोष्टींचा इशारा

औरंगाबाद मनसेने निवेदनात तीन गोष्टींचा इशारा दिला आहे- – महावितरण कॉल सेंटरवर सर्वसामान्यांचे फोन उचलले जात नाहीत, तो विषय मार्गी लावावा. – दुपारी करण्यात येणारे लोडशेडिंग आज-आत्तापासून बंद करावे – रेग्युलर वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना नाहक त्रास देऊ नये.

राज्यात कोळशाचा तुटवडा, ऊर्जामंत्री काय म्हणाले?

दरम्यान, महाराष्ट्रात सध्या कोळशाची तीव्र टंचाई निर्माण झाली असून वीजनिर्मितीवर याचा परिणाम झाला आहे. औष्णिक वीजनिर्मितीसाठीही मुबलक पाणी साठा नाही. त्यामुळे महाराष्ट्राला आता खासगी कंपनीकडून वीज विकत घ्यावी लागणार आहे. सध्या काही ठिकाणी जनतेला लोडशेडिंगचा सामना करावा लागत असला तरीही महाराष्ट्रावर हे लोडशेडिंगचं संकट कदापि येऊ देणार नाही, असं आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलं आहे.

इतर बातम्या-

Chandrakant Patil : मुख्यमंत्रिपद देऊन शिवसेनेचा हिंदुत्वाचा आधार संपविण्याचे कारस्थान, चंद्रकांत पाटलांचा पुन्हा गौप्यस्फोट

शरद पवारांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांची धडक, बाटल्या आणि चपलाही फेकल्या! विश्वास-नांगरे पाटील सिल्व्हर ओकवर

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा