AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“ज्यांनी उद्धवजींच्या डोळ्यात पाणी दिले, त्या शत्रूला सोडणार नाही”; ठाकरे गटाने शिवसेनेच्या नेत्यांना थेट इशारा दिला

ज्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यात ज्यांनी पाणी आणले आहे. त्या शत्रूला आता सोडणार नाही असा थेट इशाराच ठाकरे गटाच्या महिला नेत्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आता ठाकरे आणि शिवसेना हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

ज्यांनी उद्धवजींच्या डोळ्यात पाणी दिले, त्या शत्रूला सोडणार नाही; ठाकरे गटाने शिवसेनेच्या नेत्यांना थेट इशारा दिला
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: महादेव कांबळे | Updated on: Mar 01, 2023 | 6:10 PM
Share

औरंगाबादः शिवसेना पक्ष आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे गेल्यापासून ठाकरे गटाकडून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यात पाणी आणले, त्या शत्रूला सोडणार नाही असा इशारा ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी औरंगाबादमध्ये बोलताना दिला आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर टीका करण्याबरोबरच नुकताच प्रकाश महाजन यांनी ठाकरे गटावर आणि सुषमा अंधारे यांच्यावर पातळी सोडून टीका केली होती. त्यांच्यावर निशाणा साधताना त्यांनाही यावेळी इशारा देण्यात आला आहे.

किशोरी पेडणेकर यांच्यावर मनसेच्या संदीप देशपांडे यांनी टीका केली होती. त्याबद्दल बोलतानाही त्या म्हणाल्या की, मी पोडियमवर भाषण केलं नाही, मला पोडियमच्यावर तरी उंची द्यायची मात्र देवाने दिली नाही मात्र विचाराची उंची जास्त असायला हवी असा टोला त्यांनी टीका करणाऱ्यांना लगावला आहे.

ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, पदावर असताना बंगला म्हणजे आमचा बंगला वाटत होता.

मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे व सुषमा अंधारे यांच्यावर बोचरी टीका केली होती.

त्यांच्या टीकेला प्रत्युतर देताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, प्रमोद महाजन सोडून बाकीचे महाजन हे नाव घेण्याच्या लायकीचेही नाहीत असा टोला त्यांनी प्रकाश महाजन यांना लगावला आहे. प्रकाश महाजन यांनी परत अशी गुस्ताखी केली तर वयाचा मुलजिमा ठेवला जाणार नाही.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीका करताना त्यांनी मी अनेक राज्यपाल पाहिले पण मी दूध विकणारा राज्यपाल कधीच पाहिला नाही असा टोला त्यांनी कोश्यारी यांना लगावला आहे.

तर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल गौरवोद्गगार काढतान त्या म्हणाल्या उत्कृष्ट जगातील, देशातील मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी नाव कमावले आहे.

कसबा पोटनिवडणुकीचा उद्या निकाल जाहीर होणार आहे. त्या निकालाविषयी बोलताना आपलाच उमेदवार विजयी होणार असल्याचे सांगत उद्याचा निकाल लागला की एक एक पिस कसं काढायचं याची तयारीच करा असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आपण डोक्यावर कफन बांधूनच काम करतो आहे. त्यामुळे शिवरायांची शपथ घेउन सांगते की कुठलेही वाईट काम केले नाही पण आम्ही ठाकरे ब्रँड सोबत आहोत म्हणून त्रास दिला जातो आहे अशी टीकाही त्यांनी शिवसेनेवर केली आहे.

ज्यांनी उद्धवज ठाकरे यांच्या डोळ्यात पाणी आणले त्या शत्रूला सोडणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. त्याचबरोबर आमची मशाल यांच्या बुडाला लागणार आहे आणि यांना टेकू दिले जाणार नाही असा जोरदार टोला त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.

Follow Us
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ!
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ! पंतप्रधान आणि रोहित पवारांच्या संवादादरम्यानच...
जरांगेंनी विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नये! अभ्यासपूर्ण बोला
Sachin Kharat | विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नका! अभ्यासपूर्ण बोला; सचिन खरातांचा जरांगेंना थेट इशारा
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार...
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार... ठाकरेंचे वकील थेट निवडणुक आयोगालाच घेरणार?
वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना...
Vasai-Virar | वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना नदीचं स्वरूप
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...