AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“ज्यांनी उद्धवजींच्या डोळ्यात पाणी दिले, त्या शत्रूला सोडणार नाही”; ठाकरे गटाने शिवसेनेच्या नेत्यांना थेट इशारा दिला

ज्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यात ज्यांनी पाणी आणले आहे. त्या शत्रूला आता सोडणार नाही असा थेट इशाराच ठाकरे गटाच्या महिला नेत्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आता ठाकरे आणि शिवसेना हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

ज्यांनी उद्धवजींच्या डोळ्यात पाणी दिले, त्या शत्रूला सोडणार नाही; ठाकरे गटाने शिवसेनेच्या नेत्यांना थेट इशारा दिला
| Edited By: | Updated on: Mar 01, 2023 | 6:10 PM
Share

औरंगाबादः शिवसेना पक्ष आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे गेल्यापासून ठाकरे गटाकडून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यात पाणी आणले, त्या शत्रूला सोडणार नाही असा इशारा ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी औरंगाबादमध्ये बोलताना दिला आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर टीका करण्याबरोबरच नुकताच प्रकाश महाजन यांनी ठाकरे गटावर आणि सुषमा अंधारे यांच्यावर पातळी सोडून टीका केली होती. त्यांच्यावर निशाणा साधताना त्यांनाही यावेळी इशारा देण्यात आला आहे.

किशोरी पेडणेकर यांच्यावर मनसेच्या संदीप देशपांडे यांनी टीका केली होती. त्याबद्दल बोलतानाही त्या म्हणाल्या की, मी पोडियमवर भाषण केलं नाही, मला पोडियमच्यावर तरी उंची द्यायची मात्र देवाने दिली नाही मात्र विचाराची उंची जास्त असायला हवी असा टोला त्यांनी टीका करणाऱ्यांना लगावला आहे.

ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, पदावर असताना बंगला म्हणजे आमचा बंगला वाटत होता.

मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे व सुषमा अंधारे यांच्यावर बोचरी टीका केली होती.

त्यांच्या टीकेला प्रत्युतर देताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, प्रमोद महाजन सोडून बाकीचे महाजन हे नाव घेण्याच्या लायकीचेही नाहीत असा टोला त्यांनी प्रकाश महाजन यांना लगावला आहे. प्रकाश महाजन यांनी परत अशी गुस्ताखी केली तर वयाचा मुलजिमा ठेवला जाणार नाही.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीका करताना त्यांनी मी अनेक राज्यपाल पाहिले पण मी दूध विकणारा राज्यपाल कधीच पाहिला नाही असा टोला त्यांनी कोश्यारी यांना लगावला आहे.

तर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल गौरवोद्गगार काढतान त्या म्हणाल्या उत्कृष्ट जगातील, देशातील मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी नाव कमावले आहे.

कसबा पोटनिवडणुकीचा उद्या निकाल जाहीर होणार आहे. त्या निकालाविषयी बोलताना आपलाच उमेदवार विजयी होणार असल्याचे सांगत उद्याचा निकाल लागला की एक एक पिस कसं काढायचं याची तयारीच करा असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आपण डोक्यावर कफन बांधूनच काम करतो आहे. त्यामुळे शिवरायांची शपथ घेउन सांगते की कुठलेही वाईट काम केले नाही पण आम्ही ठाकरे ब्रँड सोबत आहोत म्हणून त्रास दिला जातो आहे अशी टीकाही त्यांनी शिवसेनेवर केली आहे.

ज्यांनी उद्धवज ठाकरे यांच्या डोळ्यात पाणी आणले त्या शत्रूला सोडणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. त्याचबरोबर आमची मशाल यांच्या बुडाला लागणार आहे आणि यांना टेकू दिले जाणार नाही असा जोरदार टोला त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.

Follow Us
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती.
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा.
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली.
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.