AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | औरंगाबादचं पालकमंत्री पद कुणाकडे? संजय शिरसाट चर्चेत, पण शिवसेनेच्या बालेकिल्ल्याची संधी भाजप सोडणार का?

मराठवाड्यातील शिंदे सेनेवर पकड ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे संजय शिरसाट यांना औरंगाबादचं पालकमंत्री पद देतील, अशी एकिकडे चर्चा आहे. मात्र यासाठी भाजप किती प्रतिसाद देईल, हेही पहावे लागणार आहे

Aurangabad | औरंगाबादचं पालकमंत्री पद कुणाकडे? संजय शिरसाट चर्चेत, पण शिवसेनेच्या बालेकिल्ल्याची संधी भाजप सोडणार का?
| Edited By: | Updated on: Jul 04, 2022 | 6:32 PM
Share

औरंगाबादः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज विधानसभेत बहुमत सिद्ध केलंय. त्यानंतर आता शिंदे सरकारमधील (Maharashtra CM) वजनदार आमदारांना लवकरच महत्त्वाची खातेवाटप होणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील पाच बंडखोर आमदार शिंदे गटात गेले आहेत. त्यापैकी तिघांना तगडी खाती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील पाचही बंडखोरांना एकत्र करून त्यांचं मन वळवण्यासाठी महत्त्वाची जबाबदारी पार पाडलेल्या संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या वाट्याला महत्त्वाचं पद येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय शिरसाट यांना औरंगाबादचं पालकमंत्री पद देण्यात येण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. मागील काही महिन्यांपासून राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्वात जवळचे आमदार अशी त्यांची प्रतिमा बनली होती. त्यामुळेच नगरविकास खात्यातून त्यांना जास्त निधी मिळाल्याचीही चर्चा आहे. मात्र आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पद शिवसेना आमदाराकडे देणं, भाजपाला कितपत रूचेल, हेही सांगणं कठीण आहे.

औरंगाबादच्या बंडखोरीत मोठी भूमिका

मागील दोन वर्षात औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील सातारा देवळाई परिसराच्या विकासासाठी आमदार संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडून भरपूर निधी मिळवला. शिंदे यांनीही शिरसाट यांना तो मुक्त हस्ते दिला. त्यामुळेच उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदे यांचे ते अधिक निकटवर्तीय मानले जाऊ लागले. त्यातच एकनाथ शिंदेंच्या गटात औरंगाबादच नव्हे तर मराठवाड्यातील इतर आमदारांना जाण्यासाठी संजय शिरसाट यांनीच मन परिवर्तन केले, अशी चर्चा अनेक स्थानिक नेते करत आहेत. यापूर्वीच महाविकास आघाडी सरकारमध्ये शिरसाट यांना मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा होती. मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पैठणचे संदिपान भूमरे यांना कॅबिनेट मंत्रीपद दिले. तर सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांना राज्यमंत्री बनवले. तेव्हापासून संजय शिरसाट अस्वस्थ असल्याची चर्चा होती. आता एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये त्यांची अपेक्षा पूर्ण होईल, अशी शक्यता आहे.

स्पर्धेत भाजपचे कोण आमदार?

मराठवाड्यातील शिंदे सेनेवर पकड ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे संजय शिरसाट यांना औरंगाबादचं पालकमंत्री पद देतील, अशी एकिकडे चर्चा आहे. मात्र यासाठी भाजप किती प्रतिसाद देईल, हेही पहावे लागणार आहे. कारण शिवसेनेचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबादेत भाजपदेखील आपलं वजन वाढवण्याच्या पवित्र्यात आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि जालन्याचे रावसाहेब दानवे यांच्या रुपाने मराठवाड्याला दोन मंत्री मिळाले आहेत. त्यांच्या पुढाकारातूनच औरंगाबादमधील भाजपाचे संघटन वाढवण्यावर भर दिला जातोय. त्यामुळे शिवसेनेचा पालकमंत्री होणं, भाजपाचा किती पडनी पडेल हेही पहावं लागेल. जिल्ह्यात भाजपाचा दबदबा वाढवण्यासाठी आमदार अतुल सावे, प्रशांत बंब यांची नावं पालकमंत्री पदाच्या स्पर्धेत आहेत. त्यामुळे हीदेखील शक्यता नाकारता येत नाही.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.