AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | आमदार सतीश चव्हाणांचा काँग्रेसला झटका, गंगापूरच्या संजय जाधवांसह नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश!

परभणी, औरंगाबाद यांसारख्या जिल्ह्यात लक्ष देण्याची गरज आहे. आगामी काळात बेरजेचे राजकारण करावे लागणार आहे. अजूनही अनेकजण राष्ट्रवादी येण्याच इच्छुक आहे, त्यांच्याशी चर्चा सुरु आहे. लवकरच त्यांचेही प्रवेश होतील, असे अजित पवार म्हणाले.

Aurangabad |  आमदार सतीश चव्हाणांचा काँग्रेसला झटका, गंगापूरच्या संजय जाधवांसह नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश!
संजय जाधव यांच्यासह काँग्रेस नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Feb 10, 2022 | 5:27 PM
Share

औरंगाबाद| आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका लक्षात घेता विविध पक्षांनी ग्रामीण भागात मोर्चेबांधणीवर जास्त भर देण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनेही  पक्ष विस्ताराला गती दिल्याचे दिसून येत आहे. औरंगाबादमधील पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण (Satish Chavan) यांनी काँग्रेसला मोठा धक्का देत त्यांच्या पक्षातील मातब्बर नेते राष्ट्रवादीत आणले. गंगापूर काँग्रेससासाठी हा मोठा धक्का आहे. गंगापूर काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष संजय जाधव (Sanjay Jadhav) यांच्यासह आणखी काँग्रेसी सहाकाऱ्यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत मुंबईत हा स्वागत सोहळा पार पडला.

गंगापुरातील किती जणांचा राष्ट्रवादी प्रवेश?

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर नगर परिषदेचे नगराध्यक्षपद सलग 15 वर्षे भूषवलेले संजय जाधव यांनी आज काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पर्वेश केला. संजय जाधव यांनी गंगापूर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते सभापतीदेखील होते. संजय जाधव यांच्यासोबत पुढील नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. – गंगापूर नगरपालिकेचे काँग्रेसचे गटनेते सुरेश नेमाडे – नगरसेवक ज्ञानेश्वर साबणे – योगेश पाटील – माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अशोक खाजेकर – नगरसेवक मोहसीन चाऊस – माजी नगरसेवक सचिन भवार – हासिफ बागवान – गंगापूर बाजार समितीचे सहा माजी संचालक – पंचायत समितीचे माजी सदस्य शारंगधर जाधव – गंगापूर युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष उमेश बारहाते यांच्यासह संजय जाधव यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

मराठवाड्यात राष्ट्रवादीचे आणखी कोणते टार्गेट?

मुंबईत संजय जाधव यांच्यासह इतर काँग्रेस नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत करताना अजित पवार यांनी मराठवाड्यातील नेत्यांवर काय काय जबाबदारी आहे, याविषयी वक्तव्य केले. संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली गंगापूर, खुलताबादचा विकास होईल, असे ते म्हणाले. तसेच परभणी, औरंगाबाद यांसारख्या जिल्ह्यात लक्ष देण्याची गरज आहे. आगामी काळात बेरजेचे राजकारण करावे लागणार आहे. अजूनही अनेकजण राष्ट्रवादी येण्याच इच्छुक आहे, त्यांच्याशी चर्चा सुरु आहे. लवकरच त्यांचेही प्रवेश होतील, असे अजित पवार म्हणाले.

इतर बातम्या-

चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘अजित पवारांनी जमिनी लाटण्याचं काम केलं’, आता दादांचं थेट उत्तर

Fact Check : पंतप्रधान मोदींना हृदयनाथ मंगेशकरांबद्दल चुकीची माहिती? आकाशवाणीतून मंगेशकरांना खरंच काढून टाकलं होतं?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली