AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चांगल्या कामासाठी औरंगाबाद महापालिकेत योग्य उमेदवार निवडून द्या, डॉ. भागवत कराड यांचे औरंगाबादेत आवाहन

औरंगाबाद: जनतेला उपयुक्त कामे दर्जेदारपणे करण्यासाठी केंद्र-राज्य सरकारकडून महापालिकेला निधी दिला जातो. त्यानुसार नियोजन आणि प्रत्यक्षात दर्जेदार कामांसाठी महापालिकेत चांगली माणसे हवीत. म्हणून तुम्ही योग्य उमेदवार निवडून द्या, असे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी केले. शनिवारी आयएमए हॉलमध्ये अ‍ॅनेस्थेशिया डे (भूलशास्त्र दिन) निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नगरसेवक […]

चांगल्या कामासाठी औरंगाबाद महापालिकेत योग्य उमेदवार निवडून द्या, डॉ. भागवत कराड यांचे औरंगाबादेत आवाहन
अ‍ॅनेस्थेशिया दिनानिमित्त डॉ. भागवत कराड यांची आयएमए हॉलमध्ये विशेष उपस्थिती
| Edited By: | Updated on: Oct 17, 2021 | 9:49 AM
Share

औरंगाबाद: जनतेला उपयुक्त कामे दर्जेदारपणे करण्यासाठी केंद्र-राज्य सरकारकडून महापालिकेला निधी दिला जातो. त्यानुसार नियोजन आणि प्रत्यक्षात दर्जेदार कामांसाठी महापालिकेत चांगली माणसे हवीत. म्हणून तुम्ही योग्य उमेदवार निवडून द्या, असे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी केले. शनिवारी आयएमए हॉलमध्ये अ‍ॅनेस्थेशिया डे (भूलशास्त्र दिन) निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

नगरसेवक ते महापौरपदाचा प्रवास उलगडला

अ‍ॅनेस्थेशिया डे (भूलशास्त्र दिन) निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले, केंद्रात मंत्री झाल्यानंतर मी शहराच्या विकासासाठी विविध योजना आखत आहे. एम्ससाठी प्रयत्न सुरू आहेत. खासदार असताना मी जेरियाट्रिक विभागासाठी २० कोटी रुपयांचा निधी मिळावा, घाटीत जेरियाट्रिक केंद्र घाटीत सुरू व्हावे यासाठी पुढाकार घेतला होता. आता मीच अर्थ राज्यमंत्री असल्यामुळे निधीची अडचण नाही. घाटीत जेरियाट्रिक सुरू करू. महापौर असताना जकात नाका, नारेगावला वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा मंजूर केली होती. माझ्यानंतर त्याचा इतर महापौरांकडून पाठपुरावा झालाच नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

डॉक्टरांनी विकासासाठी सूचना सांगाव्यात

औरंगाबादमध्ये एकेकाळी बालरोगतज्ज्ञ अशी ख्याती मिळवलेले डॉ. भागवत कराड म्हणाले, शहरातील साडेतीन हजार डॉक्टरांनी मंत्रिपद मिळाल्यावर माझे अभिनंदन केले. मी तुम्हा सर्व डॉक्टरांचा प्रतिनिधी आहे. शहराच्या विकासासाठी तुमच्या सूचना सांगा. त्या अमलात आणण्यासाठी निश्चित पुढाकार घेईन, असे आश्वासनही डॉय भागवत कराड यांनी दिले. या कार्यक्रमात डॉ. संगीता देशपांडे, डॉ. सुजाता झिने, डॉ. अर्चना मोहगावकर, डॉ. अजित घायाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

भागवत कराड यांचा प्रवास कसा?

-1995 ते 2009 या कालावधीत औरंगाबाद महापालिकेत तीन वेळा नगरसेवक -1997 ते 1998 औरंगाबादचे उपमहापौर -2000 ते 2001 आणि 2006 ते 2007 औरंगाबादचे महापौर -2009 मध्ये औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी

इतर बातम्या-

केंद्रीय मंत्री कसा झालो?; भागवत कराड यांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

PHOTO: अतिवृष्टीग्रस्त औरंगाबादेत भागवत कराडांचा दौरा, कुठे चिखल तुडवला तर कुठे बाइक, ट्रॅक्टरवर स्वारी

Follow Us
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.