AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवराज पाटील यांनी पुन्हा केलं ‘जिहाद’च समर्थन, त्यांनी थेट अर्थच सांगितला…

माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील यांनी दिल्लीनंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात जिहादचं समर्थन केले आहे.

शिवराज पाटील यांनी पुन्हा केलं 'जिहाद'च समर्थन, त्यांनी थेट अर्थच सांगितला...
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: महादेव कांबळे | Updated on: Nov 08, 2022 | 8:08 PM
Share

औरंगाबादः मागील काही दिवसांपूर्वी दिल्लीतील एका पुस्तक प्रदर्शना जिहादविषयी माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. दिल्लीतील त्यावेळी केलेल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी जाहीररित्या जिहादचं समर्थन केले असल्याने त्यांच्यावर प्रचंड टीकाही करण्यात आली होती. त्यानंतर काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी काढलेली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली असताना त्यावेळी शिवराज पाटील यांनी पुन्हा एकदा जिहादचं समर्थन केले. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील यांनी जिहादचं समर्थन करताना त्यांनी यावेळी अर्थही सांगितला आहे. जिहादविषयी बोलताना ते म्हणाले की, जिहाद म्हणजे वाईटाच्या विरोधात केलेली कृती आहे.

एखादा वाईट व्यक्ती वाईट कृत्य करत असेल आणि तो बंदूक किंवा काठी घेऊन येत असेल तर त्याच्या विरोधात उठाव करणे म्हणजे जिहाद अशा प्रकारचा अर्थ असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

त्यामुळे शिवराज पाटील यांचे हे वक्तव्य पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

कर्नाटक, तेलंगाना असा प्रवास करुन आता काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली आहे. त्यामुळे राज्यासह देशातील अनेक नेते या यात्रेत सहभागी झाले आहेत.

भारत जोडो यात्रेविषयीही शिवराज पाटील यांनी मत व्यक्त करताना सांगितले की, राहुल गांधी यांची पदयात्रा म्हणजे सामान्य माणसाचं म्हणणे ऐकून घेणारी यात्रा आहे.

त्यामुळे यात्रेला उदंड प्रतिसाद लाभत असल्याचेही त्यांनी सांगितले. भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेस पक्षाला उभारी मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Follow Us
मोठा पूर! 33 हजार 408 क्युसेकने विसर्ग सुरू, महाराष्ट्रातील पवित्र नदी
मोठा पूर! 33 हजार 408 क्युसेकने विसर्ग सुरू, महाराष्ट्रातील पवित्र नदीचा धडकी भरवणारा Video
मविआ'तील गळती काही थांबेना! पद, 20 कोटी अन्... बड्या नेत्याच्या दाव्या
मविआ'तील गळती काही थांबेना! पद, 20 कोटी अन्... बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ
अखेर शिंदेंनी दिलेला शब्द पाळला! प्रकृती ठिक नसतानाही थेट काश्मीरमध्ये
अखेर शिंदेंनी दिलेला शब्द पाळला! प्रकृती ठिक नसतानाही थेट काश्मीरमध्ये पोहोचवली मदत
सचिन अहिर यांनी पक्ष प्रवेश करताच मुलीची प्रतिक्रिया, थेट आदित्य ठाकरे
सचिन अहिर यांनी पक्ष प्रवेश करताच मुलीची प्रतिक्रिया, थेट आदित्य ठाकरेंवर... नेमकं काय म्हणाली?
राज्यात पावसाचा हाहाकार! विज पुरवठाही खंडीत, तब्बल 4 शहरांना...
राज्यात पावसाचा हाहाकार! विज पुरवठाही खंडीत, तब्बल 4 शहरांना...
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?