AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगजेब..? छे छे छे छे… शी शी शी… गुणरत्न सदावर्ते यांनी असं का केलं?; प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर काय म्हणाले?

प्रकाश आंबेडकर यांनी औरंजेबाचं दर्शन घेतल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. आंबेडकर यांच्या या कृतीवर राजकीय वर्तुळातून टीका होत असतानाच आता या वादात वकील गुणरत्न सदावर्ते यांनीही उडी घेतली आहे.

औरंगजेब..? छे छे छे छे... शी शी शी... गुणरत्न सदावर्ते यांनी असं का केलं?; प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर काय म्हणाले?
gunratna sadavarteImage Credit source: tv9 marathi
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: | Updated on: Jun 18, 2023 | 12:02 PM
Share

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खुलताबादमध्ये औरंजेबाच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यावरून वादंग निर्माण झाला आहे. सत्ताधारी पक्षांनी हा मुद्दा लावून घेत आंबेडकरांवर टीका केली आहे. तर आंबेडकरांच्या या कृतीवरून सत्ताधाऱ्यांनी ठाकरे गटाला घेरलं आहे. ठाकरे गटाने आता यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. तसेच ठाकरे गट औरंगजेबासमोर झुकणाऱ्या नेत्यांसोबत मांडीला मांडी लावून बसणार आहे काय? असा सवालही विरोधकांनी केला आहे. आता या वादात वकील गुणरत्न सदावर्ते यांनीही उडी घेतली आहे. औरंजेब हा पर्याय होऊ शकत नाही. जयचंदपेक्षा महोरक्या महत्त्वाचा असतो, असा पलटावर गुणरत्न सदावर्ते यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर केला आहे.

गुणरत्न सदावर्ते यांनी मीडियाशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली. आशा विचारांच्या कुणी किती निकट जावे हे ठरवले पाहिजे. औरंगजेबाचे उदात्तीकरण होत आहे, हे संविधान मानणारा माणूस मान्य करू शकत नाही. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवरायांचे वारसदार औरंगजेबाला थारा देऊ शकत नाही, असं गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं.

त्या मतांचा फायदा होणार नाही

प्रकाश आंबेडकर धर्मावर राजकारण करत नाहीत, पण प्रत्येकाने स्वतःत बदल केला पाहिजे. अल्पसंख्याक समाजातील मते बाळासाहेबांना कधीही मिळत नव्हती. पण बाळासाहेबांच्या डोक्यात काय चाललंय कळत नाही. त्यांचा एमआयएमचा फॉर्म्युला फेल गेला होता. त्यामुळे आता काहीही होणार नाही. प्रकाश आंबेडकर यांना अल्पसंख्याक समाजाचा काहीही फायदा होणार नाही, असा दावा सदावर्ते यांनी केला.

शी शी शी… छे छे

जयचंद पेक्षाम्होरक्या महत्त्वाचा असतो. प्रकाश आंबेडकर वकील आहेत ते आपली थिअरी लादतात. औरंगजेब हा पर्याय होऊच शकत नाही. औरंगजेब..? छे छे छे छे छे छे छे छे छे छे छे छे… शी शी शी… छे छे, असंही ते म्हणाले.

इस बदलाव को क्या कहेंगे?

राजकारणासाठी उद्धव ठाकरे फिट नाहीत. प्रकाश आंबेडकर हे राजकारणासाठी कधीही कुणाची वकिली करत नव्हते, इस बदलाव को क्या कहेंगे? हा हा हा हा हा हा हा, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

Follow Us
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी घेण्याचे आवाहन!
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर; औरंगाबादमध्ये नवं समीकरण
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती समोर
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?