AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चिकलठाणा एमआयडीसी कंपन्यांमध्येही पाणी शिरले, कर भरूनही नालेसफाई न केल्याने उद्योजकांचा पालिकेवर संताप

एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये पाणी शिरल्याने सुमारे 50 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीचे अध्यक्ष नारायण पवार यांनी दिली.

चिकलठाणा एमआयडीसी कंपन्यांमध्येही पाणी शिरले, कर भरूनही नालेसफाई न केल्याने उद्योजकांचा पालिकेवर संताप
प्रातिनिधीक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Sep 29, 2021 | 12:09 PM
Share

औरंगाबाद: मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने शहरातील (Heavy Rain in Aurangabad) जवळपास सर्वच भागांना नुकसान पोहोचले आहे. चिकलठाणा आणि रेल्वेस्टेशन एमआयडीसीतील सर्वच कंपन्यांनाही पावसाचा फटका बसला आहे. मनपाने (Aurangabad Municipal cororation) कर भरूनही ना चांगले रस्ते दिले ना सफाई केली, अशी तक्रार उद्योजक करत आहेत. आता इंडस्ट्रीतील अनेक युनिटमध्ये पाणी गेल्याने उद्योजकांना स्वतः यंत्रणा लावून हे पाणी काढावे लागत आहे. एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये (MIDC Aurangabad) पाणी शिरल्याने सुमारे 50 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीचे अध्यक्ष नारायण पवार (Narayan Pawar) यांनी दिली.

पालिकेची नालेसफाई नावालाच

27 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीपासून झालेल्या पावसामुळे शहरातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. उद्योग जगतालाही मोठा फटका बसला आहे. चिकलठाणा एमआयडीसीत 500 तर वाळूजमध्ये 800 हून अधिक युनिट आहेत. नारेगाव भागात रस्त्याचे काम झाले तेव्हा पुलाखाली असलेल्या पाठपमद्ये माती भरल्याने पाणी जाण्यास जागा राहिली नाही. त्यामुळे अनेक कंपन्यांत पाणी शिरले. मनपाने मध्यंतरी केलेली नालेसफाई नावालाच झाल्याचा आरोप उद्योजकांनी केला आहे.

4 तास पाणी उपसून काढले

चिकलठाणा एमआयडीसीतील सर्व कंपन्या महानगरपालिकेचा कर भरतात. पण येथील परिसराला महानगरपालिकेतर्फे मूलभूत सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. विशेष म्हणजे हा प्रकार या वर्षीचाच नानही. गेल्या तीन-चार वर्षांपासून आम्हाला या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आम्हाला कर्मचारी लावून 4 तास पाणी उपसून काढावे लागत असल्याची तक्रार विजय लेकुरवाळे यांनी केली.

तुळजा ऑइल कंपनीचे अडीच लाखांचे नुकसान

चिकलठाण्यात तुळजा ऑइल कंपनी आहे. हिंदुस्थान गॅस कंपनीच्या भिंतीच्या बाजूला नाला आहे. तो बंद झाल्याने या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले आहे. कंपनीतच गुडघाभर पाणी शिरल्याने येथील मशीनरी आणि साधन सामग्रीचे सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. 1984 पासून हाच प्रकार सुरु आहे. मुसळधार पाऊस येताच, कंपनीत पाणी शिरते, अशी तक्रार अनिल कसबेकर यांनी केली.

इतर बातम्या- 

Aurangabad: पाहता पाहता दोघे वाहून गेले, नागझरी नदीच्या महापुरातून जात होते शेतकरी, गावात पोहोचलेच नाहीत

Aurangabad Crime:  9 महिन्यात 62 गुन्ह्यांची उकल करण्यात श्वानांची मदत, औरंगाबाद पोलीस दलातील प्रशिक्षित श्वानांची कामगिरी  

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.