AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

High Court | राज्यातील आंदोलनाचे सर्व खटले 2 आठवड्यात निकाली काढा, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे काय आदेश?

अॅड. अजित काळे यांच्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना, औरंगाबाद खंडपीठाने राज्यातील सर्व फौजदारी न्यायालयांना दोन आठवड्यात सदर प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत. तसेच औरंगाबाद खंडपीठातील प्रलंबित प्रकरणे एकत्रित करून योग्य त्या आदेशासाठी खंडपीठाकडे ठेवण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

High Court | राज्यातील आंदोलनाचे सर्व खटले 2 आठवड्यात निकाली काढा, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे काय आदेश?
महिला पोलीस कॉन्स्टेबलला थप्पड मारणारी महिला निर्दोषमुक्तImage Credit source: टीव्ही9
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Apr 20, 2022 | 12:04 PM
Share

औरंगाबादः राज्यातील विविध सामाजिक व राजकीय पक्ष संघटनांनी केलेली आंदोलने (Agitations) तसेच मोर्चाचे खटले (Protests), ज्यात जीवित हानी झाली नाही व पाच लाखांपेक्षा अधिकच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले नाही, असे खटने पुढील दोन आठवड्यात निकाली काढा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad Bench) दिले आहेत. यासंदर्भाती प्रलंबित अर्ज प्रामुख्याने सुनावणीसाठी घेण्याच्या सूचना कोर्टाने केल्या आहेत. सार्वजनिक हिताच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक व राजकीय पक्ष संघटनांनी केलेल्या या आंदोलनांबाबतचे हे निर्देश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. डी. धनुका व न्या. एस. जी. मेहरे यांनी राज्यातील फौजदारी न्यायालयांना दिले आहेत.

शासन आदेशाकडे दुर्लक्ष?

राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्यामार्फत सार्वजनिक हिताच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बंद, घेराव घालणे, मोर्चा काढणे, निदर्शने आदी प्रकारचे आंदोलन केले जाते. काही ठिकाणी आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र असे खटले मागे घेण्यात यावेत, असा 7 जुलै 2010, 12 जानेवारी 2015 आणि 14 मार्च 2016 आणि 2017 रोजी राज्य सरकारने दिले होते. असे असूनही यावर कारवाई झालेली नाही. यानिरोधात शेतकरी संघठनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांनी 15 ऑक्टोबर 2018 व 09 डिसेंबर 2019 रोजी शासनाला विनंती करून कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे अॅड. काळे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून सदर शासन निर्णयाप्राणे प्रलंबित असलेली प्रकरणे तत्काळ काढून घेण्यासंदर्भात विनंती केली.

पुढील सुनावणी 15 जून रोजी

अॅड. अजित काळे यांच्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना, औरंगाबाद खंडपीठाने राज्यातील सर्व फौजदारी न्यायालयांना दोन आठवड्यात सदर प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत. तसेच औरंगाबाद खंडपीठातील प्रलंबित प्रकरणे एकत्रित करून योग्य त्या आदेशासाठी खंडपीठाकडे ठेवण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. या जनहित याचिकेची पुढील सुनावणी 15 जून 2022 रोजी होईल.

इतर बातम्या-

Budh gochar | बुधच्या संक्रमणाने या राशींना येतील सोन्याचे दिवस, तुमची रास यामध्ये आहे का ?

Nagpur Election | निवडणूक कामाविरोधात शिक्षक जाणार न्यायालयात; राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा इशारा

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार