AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादनंतर जालन्यात जलाक्रोश, पाणी प्रश्नासाठी मामा चौकात भव्य मोर्चा, देवेंद्र फडणवीस इथेही मैदानात !

आजच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि जालना भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्याशी टीव्ही 9 प्रतिनिधींनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ' जालन्यात 12 दिवस पाणी येत नाही. आमच्या सरकारमध्ये आम्ही वितरण व्यवस्थेसाठी निधी मंजूर केला. आम्ही लोकांचा चेहरा बनून हा मोर्चा काढला आहे.

औरंगाबादनंतर जालन्यात जलाक्रोश, पाणी प्रश्नासाठी मामा चौकात भव्य मोर्चा, देवेंद्र फडणवीस इथेही मैदानात !
Image Credit source: tv9 marathi
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jun 15, 2022 | 2:05 PM
Share

जालना | औरंगाबादनंतर जालन्यात भाजपतर्फे जलाक्रोश मोर्चा (Jalakrosh Morcha) काढण्यात येत आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे. काँग्रेसच्या सत्तेखालील नगरपालिकेने अनेक वर्षांपासून शहरातील पाण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष केलं आहे. शहरातील प्रमुख दोन जलाशयांमध्ये अनेक भागांत दहा ते पंधरा दिवसाआड पाणी येतं. मात्र शहरवासियांना किमान आठ दिवसातून दोनदा पाणी मिळावं, या मागणीसाठी भाजपतर्फे हा जलाक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. जालन्यातील या मोर्चाची जय्यत तयारी भाजपतर्फे कऱण्यात आली होता. आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या उपस्थितीत भाजपातर्फे हा मोर्चा काढण्यात येत आहे. जालन्यातल्या मामा चौकात यानिमित्त आज सकाळपासूनच भाजप कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली होती. सकाळी 11 वाजेनंतर शेकडो कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी या मोर्चात सहभाग नोंदवत पालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.

रिकाम्या कळशा, हंडे घेऊन माहिला

जालन्यातील या जलाक्रोश मोर्चात असंख्य महिला पाणी प्रश्नावरावर आवाज उठवण्यासाठी एकत्र आल्या. या महिलांच्या डोक्यावर रिकाम्या कळश्या आणि रिकामे माठ होते.

Jalna BJP Morcha

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाणीप्रश्न पेटला

जालना शहरात आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणी प्रश्न पेटला आहे. शहरातील दोन्ही जलाशयांमध्ये पाणी उपलब्ध असतानाही पंधरा दिवसा आड पाणी येतं. तसेच अंतर्गत जलवाहिनी उशीराने होत आहे. पालिका निवडणुकांच्या तोंडावर हाच मुद्दा उचलून धरण्यात आला आहे. भाजपचा जुना मित्र असेलल्या शिवसेनेने पालिकेत युती तोडली आहे. त्यामुळे भाजपला एकट्याला लढावे लागणार आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या पालिकेच्या कारभाराविरोधात भाजपने रणशिंग फुंकले आहे. त्यासाठी पाण्याचा प्रश्न घेऊन जालनेकरांचा आक्रोश मांडण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे.

Jalna BJP Morcha

रावसाहेब दानवे काय म्हणाले?

आजच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि जालना भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्याशी टीव्ही 9 प्रतिनिधींनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ‘ जालन्यात 12 दिवस पाणी येत नाही. आमच्या सरकारमध्ये आम्ही वितरण व्यवस्थेसाठी निधी मंजूर केला. आम्ही लोकांचा चेहरा बनून हा मोर्चा काढला आहे. कुणीतरी राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा लागतो. त्यामुळे आम्ही जालनेकरांचा आवाज बनून पुढे आलो आहोत, पालिका प्रशासनाला आमचा आक्रोश ऐकावाच लागेल…

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ