AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे यांची प्रकृती प्रचंड खालावली… उपचारही सोडले, दानवे थेट अंतरवलीत; काय घडतंय?

मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठीचे उपोषण १० दिवसांपासून सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. त्यांनी उपचारांना नकार दिला आहे. ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी अंतरवलीत भेट देऊन जरांगे यांच्या मागण्या तातडीने मान्य करण्याची सरकारकडे मागणी केली आहे.

मनोज जरांगे यांची प्रकृती प्रचंड खालावली... उपचारही सोडले, दानवे थेट अंतरवलीत; काय घडतंय?
ambadas danveImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 07, 2026 | 11:27 AM
Share

मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या 10 दिवसांपासून उपोषण सुरू केलं आहे. त्यांनी पाणी घेण्यासही नकार दिला आहे. तसेच उपचारही नाकारले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अधिकच खालावली आहे. त्यामुळे मराठा आंदोलकांमध्ये चिंता पसरली आहे. जरांगे यांची प्रकृती खालावल्याने ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे हे त्यांना भेटण्यासाठी अंतरवलीत आले आहेत. अंतरवलीत येऊन त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावल्याने वैद्यकीय पथक अंतरवलीत ठाण मांडून बसलं आहे. जिल्हा शल्यचिकित्सक आणि त्यांची टीम दाखल त्यांना उपचार घेण्यासाठी आग्रह धरत आहे. मात्र, जरांगे पाटलांनी उपचार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. गेल्या 10 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. सध्या त्यांची प्रकृती अधिक खालावली आहे. काल सायंकाळी जरांगेंची प्रकृती अधिक खालावली होती. मात्र, जरांगे उपचार घेत नाहीयेत, अशी माहिती मराठा आंदोलक अशोक काळकुटे यांनी दिली आहे. दरम्यान, जरांगे यांची प्रकृती खालावल्याने अंतरवलीत मराठा समाजाची मोठी गर्दी झाली आहे.

मागण्या ताबडतोब मान्य करा

अंबादास दानवे यांनी जरांगे यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. दानवे यांनी उपोषण सोडावं अशी विनंती दानवे यांनी केली आहे. जरांगे यांनी ज्या मागण्या मांडलेल्या आहेत, त्या मागण्या ताबडतोब मान्य करण्याची गरज आहे. मी सर्वांशी चर्चा केली, सरकारने दखल घेण्याची आवश्यकता आहे. त्वरेने मागण्या मान्य झाल्या नाहीत तर विस्फोट होऊ शकतो आणि त्याला जबाबदार कोण आहे हे सांगायची गरज नाही. सर्टिफिकेट मिळताना अडचणी येत आहेत तर काही जणांचे प्रमाणपत्र रद्द झाले आहेत. यामुळे हे जाणीवपूर्वक होत आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो, असं दानवे यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितलं.

मला पुरावे देण्याची गरज काय?

यावेळी त्यांनी काही सवाल सरकारला केले आहेत. हैद्राबाद गॅझेटचं काय झालं? 55 लाख नोंदी करण्यात आल्या आहेत तर मग प्रमाणपत्र दिले का? माझ्या आजोबांच्या गॅझेटमध्ये कुणबी म्हणून नोंद असेल तर मला पुरावे देण्याची काय गरज आहे? असा सवाल दानवे यांनी केला आहे.

अंतरवलीत मोठी गर्दी

दरम्यान, जरांगे यांची प्रकृती अत्यंत खालावल्याचं कळताच समाजातील लोकांनी अंतरवलीची वाट धरली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून लोक अंतरवलीत येत आहेत. मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस करत आहेत.

Follow Us
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ