AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray: आरक्षण दिलं तर निवडणूक न लढवण्याचं एमआयएमनं जाहीर केलंय, तुम्ही कसं बघता? राज ठाकरेंनी एका वाक्यात विषय संपवला

मुस्लिम आरक्षण दिलं तर आम्ही महापालिका निवडणुका लढवणार नाहीत, अशी घोषणा काल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली, त्यावर राज ठाकरे यांनी खरमरीत प्रतिक्रिया दिली.

Raj Thackeray: आरक्षण दिलं तर निवडणूक न लढवण्याचं एमआयएमनं जाहीर केलंय, तुम्ही कसं बघता? राज ठाकरेंनी एका वाक्यात विषय संपवला
औरंगाबादमध्ये राज ठाकरेंचा पत्रकारांशी मनमोकळा संवाद
| Edited By: | Updated on: Dec 14, 2021 | 2:58 PM
Share

औरंगाबादः एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी काल महाविकास आघाडी सरकारला खुली ऑफर दिली. मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं तर एमआयएम महापालिका निवडणुकीसाठी कुठेही उमेदवार उभा करणार नाही, असे खा. जलील म्हणाले. त्यावर आघाडी सरकारमधील नेते, मंत्री तसेच इतर पक्षांच्या काय प्रतिक्रिया आहेत, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. आज औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनाही एमआयएमच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर त्यांनी फक्त एका वाक्यात उत्तर देणे पसंत केले.

MIM च्या ऑफरवर काय म्हणाले राज ठाकरे?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात आज औरंगाबादमध्ये मराठवाड्यातील सर्व जिल्हे आणि तालुक्यांमधील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज ठाकरे यांनी यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना अत्यंत बेधडकपणे उत्तरे दिली. यावेळी एका पत्रकाराने त्यांना आरक्षण दिलं तर निवडणूक न लढवण्याचं एमआयएमनं जाहीर केलंय, याकडे तुम्ही कसं बघता, असा प्रश्न विचारला. तेव्हा राज ठाकरे यांनी उत्तर दिलं, ‘हे कुणी म्हटलंय.. तो कुणाला माहितीच नाही. मुंबईत तर माहितीच नाही. मुंबईतल्या एका पत्रकाराला तर तिथं एमआयएमची सभा होती, हेही माहिती नव्हतं. यावरून तुम्ही काय ठरवायचं ते ठरवा.’

निवडणुका लांबवण्यासाठी आरक्षणचा मुद्दा

MNS GFX

राज ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर आरक्षणाचा मुद्दा पुढे करत निवडणुका लांबवत असल्याचा आरोप यावेळी केला. ते म्हणाले, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकार केवळ एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहे. राज्य सरकार म्हणतंय केंद्रानं आकडेवारी द्यावी, तर केंद्र सरकार म्हणतंय हे राज्याचं काम आहे. केंद्राकडे आकडेवारी असेल तर त्याने ती देणं अपेक्षित आहे. हे दोन्ही सरकार केवळ निवडणुका पुढे ढकलण्यासाठी ओबीसी आरक्षणावरून गोंधळ घालतायत, असा आरोप त्यांनी केला.

इतर बातम्या-

Raj Thackeray : महाविकास आघाडी सरकार पडेल असं वाटत नाही; राज ठाकरे यांचं मोठं विधान

निवडणुका पुढे ढकलण्यासाठीच ओबीसी आरक्षणाचा गोंधळ सुरू; राज ठाकरे यांचा आरोप

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.