AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादेत सक्तीच्या लसीकरणाविरोधात याचिका, जिल्हा प्रशासन, महापालिकेला नोटीस, प्रतिज्ञापत्रही सादर

एकिकडे औरंगाबादच्या सक्तीच्या लसीकरणाचा पॅटर्न इतर जिल्ह्यांमध्ये राबवण्याचा विचार सुरु आहे तर दुसरीकडे याच सक्तीच्या विरोधात थेट हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी काल न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र सादर केलं.

औरंगाबादेत सक्तीच्या लसीकरणाविरोधात याचिका, जिल्हा प्रशासन, महापालिकेला नोटीस, प्रतिज्ञापत्रही सादर
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Dec 23, 2021 | 1:10 PM
Share

औरंगाबादः लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी औरंगाबाद जिल्हाधिकारी (Aurangabad Collector) आणि मनपा आयुक्तांनी सक्तीची पावले उचलली. यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा आकडा वेगाने पुढे सरकला. मात्र या सक्तीच्या लसीकरणाविरोधात (Aurangabad Vaccination) विधी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी दंड थोपटले. लस न घेतलेल्यांच्या पर्यटन, प्रवासावर बंदी घालणे हे घटनेने दिलेल्या अधिकारांच्या विरोधात असल्याची याचिका त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad Bench) दाखल केली. या प्रकरणी बुधवारी सुनावणी झाली. न्यायालयाने राज्याचे मुख्य सचिव, जिल्हाधिकारी, महानगर पालिका आयुक्त/ प्रशासक आणि अन्य प्रतिवाद्यांना नोटीस बजावली आहे. यावर 12 जानेवारी रोजी पुढील सुनावणी होईल.

जिल्हा प्रशासनाचे प्रतिज्ञापत्र सादर

लसीकरणासाठी कोणतीही सक्ती वा बळजबरी करण्यात येत नाही. नागरिकांच्या हक्काचे कुठल्याही प्रकारे हनन करण्यात आले नसल्याचे प्रतिज्ञापत्र जिल्हा प्रशासनाने औरंगाबाद खंडपीठात दाखल केले आहे. तहसीलदार पूजा सुदाम पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने हे प्रतिज्ञापत्र सादर केले.

याचिकेत नेमके आक्षेप कशावर?

जिल्हाधिकाऱ्यांनी सुरु केलेल्या सक्तीच्या लसीकरणाविरोधात औरंगाबादमधील शिकाऊ वकिलांनी ही याचिका दाखल केली आहे. विधी शाखेचे विद्यार्थी इमाद मुजाहिद कुरैशी आणि आमेर युसूफ पटेल यांनी अॅड. सईद शेख यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली आहे. यात पुढील मुद्द्यांवर आक्षेप घेण्यात आला आहे- – केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर लसीकरण अनिवार्य नसल्याचे मत नोंदवले आहे. -सर्वोच्च न्यायालय आणि गोवा उच्च न्यायालयात सरकारकडून दाखल शपथपत्रातही लसीकरणाची सक्ती नसल्याची माहिती मिळते. – लस न घेतलेल्या नागरिकाबाबत कोणताही भेदभाव न करण्याचे केंद्राचे निर्देश आहेत. मात्र औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी 25 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या आदेशात लस न घेतलेल्या नागरिकांना प्रवासासाठी तिकीट नाकारले आहे. यामुळे याचिकाकर्त्याच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

इतर बातम्या-

शारीरिक संबंधानंतर तरुणाकडून ब्लॉक, चिडलेल्या युवतीचं टोकाचं पाऊल

आदित्य ठाकरेंना धमकी, मी स्वत: कर्नाटकात जातो, फडणवीसांचा शब्द, रजा अकादमी, सनातनवरही मोठं वक्तव्य

Follow Us
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्ये रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्ये रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक
माणसं प्रेमाने जिंकता येतात!; सुळेंच्या आव्हानावर फडणवीसांचा पलटवार
Devendra Fadnavis | माणसं प्रेमाने जिंकता येतात!; सुप्रिया सुळेंच्या आव्हानावर फडणवीसांचा पलटवार