औरंगाबादः लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी औरंगाबाद जिल्हाधिकारी (Aurangabad Collector) आणि मनपा आयुक्तांनी सक्तीची पावले उचलली. यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा आकडा वेगाने पुढे सरकला. मात्र या सक्तीच्या लसीकरणाविरोधात (Aurangabad Vaccination) विधी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी दंड थोपटले. लस न घेतलेल्यांच्या पर्यटन, प्रवासावर बंदी घालणे हे घटनेने दिलेल्या अधिकारांच्या विरोधात असल्याची याचिका त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad Bench) दाखल केली. या प्रकरणी बुधवारी सुनावणी झाली. न्यायालयाने राज्याचे मुख्य सचिव, जिल्हाधिकारी, महानगर पालिका आयुक्त/ प्रशासक आणि अन्य प्रतिवाद्यांना नोटीस बजावली आहे. यावर 12 जानेवारी रोजी पुढील सुनावणी होईल.