AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video Raosaheb Danve | राणा आणि सोमय्यांवरील हल्ल्याचा राडा! दानवे म्हणतात, कुणाच्याही घरावर जाणं ठीक नाही, पण…

राणा कुटुंबाच्या घराबाहेर असलेले शिवसैनिक पोलिसांनी हटवले नाहीत. आंदोलकांशी सरकारचे प्रतिनिधी जाऊन चर्चा करतात. पण राणा दाम्पत्यांशी चर्चा केली नाही. उलट शिवसैनिक पाठवून दबाव निर्माण केला जात आहे.

Video Raosaheb Danve | राणा आणि सोमय्यांवरील हल्ल्याचा राडा! दानवे म्हणतात, कुणाच्याही घरावर जाणं ठीक नाही, पण...
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेImage Credit source: tv 9
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: Govinda Hatwar | Updated on: Apr 24, 2022 | 10:13 AM
Share

औरंगाबाद : या राज्यात देशात अनेक आंदोलनं झाली. सत्ताधाऱ्यांनी चर्चा केल्या. कुणाच्याही घरावर जाणं ठीक नाही. हनुमान चालीसा करण्यासाठी कुणी जात असेल, तर सरकारच्या लोकांनी पोलिसांनी समजूत काढली पाहिजे. पण शिवसैनिकांना (Shiv Sena) पाठवून त्यांना धमकावणं, हे चुकीचं. लोकशाहीला न शोभणार आहे. विरोधकांची मुस्कटदाबी करणं, यामुळे हे केलं जातंय. हे केवळं आणीबाणीच्या काळातच झालं होतं. पण आणीबाणीनंतर काँग्रेसचं वटवृक्षासारखं असलेला सरकार लोकांना मुळासकट उपटून काढलं. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारचंही तेच होणार आहे. जनता यांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा केंद्रीय मंत्री (Union Minister) रावसाहेब दानवे यांनी दिलाय.

राणा दाम्पत्याची समजूत काढायला हवी होती

रावसाहेब दानवे म्हणाले, पोलिसांना पुढं करून राजकारण करण्याचा धंदा सुरू केलाय. पोलिसांना बदनाम करण्याचं काम महाराष्ट्र सरकार करतंय. त्यांनी मातोश्रीवर जायला हवं, या मताचे आम्ही नाही. पण सरकारच्या प्रतिनिधींनी जायला हवं, त्यांची समजून काढायला हवी होती. अण्णांची जशी सरकारनं समजून काढली होती, तशी समजून काढता आली असती. पण गुंडगिरी करुन त्यांचा डाव हाणून पाडलं, महाराष्ट्राला शोभनीय नाही.

शिवसैनिकांवर गुन्हा का नाही

रावसाहेब दानवे यांनी सांगितलं की, महाराष्ट्रात आणीबाणी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्या पोलिसांच्या विश्वासाहार्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. किरीट सोमय्या यांच्या ड्राईव्हरगुन्हा दाखल झाला. मात्र शिवसैनिकांवर गुन्हा दाखल झाला नाही. बॉम्बस्फोटावेळी महाराष्ट्रात जेवढी परिस्थिती खराब झाली नव्हती तेवढी परिस्थिती आज खराब झाली आहे. राणा कुटुंबाच्या घराबाहेर असलेले शिवसैनिक पोलिसांनी हटवले नाहीत. आंदोलकांशी सरकारचे प्रतिनिधी जाऊन चर्चा करतात. पण राणा दाम्पत्यांशी चर्चा केली नाही. उलट शिवसैनिक पाठवून दबाव निर्माण केला जात आहे. राणा दाम्पत्याना अटक केली जाते.

लोकशाहीची मुस्कटदाबी

या राज्यात लोकशाहीची मुस्कटदाबी सुरू आहे. राणा दाम्पत्य हे शांततेच्या मार्गानं हनुमान चालीका म्हणणार होते. अशावेळी त्यांच्यावर दबाव आणण्यात आला. दबावाला ते बळी पडले नाहीत. म्हणून शिवसैनिकांनी त्यांच्या घरावर हल्ला केला. अमरावती आणि मुंबई येथील राणा दाम्पत्याच्या घरावर आंदोलन करण्यात आले. हे योग्य नव्हे. गुन्हे खऱ्या अर्थानं आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांवर लावायला पाहिजे होते. पण, तसं झालं नाही. उलट राणा दाम्पत्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचंही रावसाहेब दानवे म्हणाले.

Amravati Shiv Sena | राणांचे हनुमान चालीसा वाचन स्थगित, अमरावतीत फटाके फोडून शिवसैनिक परतले

Sanjay Raut | खासदार बाई यांचा हिंदुत्वाचा संबंध काय? संजय राऊत यांचा नवनीत राणा यांच्यावर घणाघात

Amravati Shiv Sainik | रवी राणांचा घरावर दगडफेक केल्याचा आरोप; अमरावतीत शिवसैनिक आक्रमक

Follow Us
जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण?
CJP Protest | जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण? जाणून घ्या संपूर्ण कहाणी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवलं अन् दीड वर्षाचा... काय घडलं?
शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं
Sanjay Raut on NCP | शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले, थेट...
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून
मोठी बातमी! कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून कोर्टात याचिका दाखल
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...