AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रझा अकादमी हे भाजपचं पिल्लू, त्रिपुराचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्याचे काय कारण? संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा

औरंगाबादः त्रिपुरा दंगलीचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्यामागे भाजपचाच हात असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. औरंगाबादमध्ये त्यांनी टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी बोलताना हे वक्तव्य केले. देशभरात वाढलेल्या महागाईविरोधात संजय राऊत यांच्या नेतृत्वात आज औरंगाबादमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त औरंगाबादमध्ये असताना संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्रिपुरातलं लोण इथे यायचं कारण […]

रझा अकादमी हे भाजपचं पिल्लू, त्रिपुराचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्याचे काय कारण? संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा
औरंगाबादमध्ये संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा
| Edited By: | Updated on: Nov 13, 2021 | 10:36 AM
Share

औरंगाबादः त्रिपुरा दंगलीचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्यामागे भाजपचाच हात असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. औरंगाबादमध्ये त्यांनी टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी बोलताना हे वक्तव्य केले. देशभरात वाढलेल्या महागाईविरोधात संजय राऊत यांच्या नेतृत्वात आज औरंगाबादमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त औरंगाबादमध्ये असताना संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली.

त्रिपुरातलं लोण इथे यायचं कारण स्पष्ट आहे- राऊत

महाराष्ट्रात पेटलेल्या दंगलींचे कारण काय असा प्रश्न विचारला असता, संजय राऊत म्हणाले, ज्या रझा अकादमी संघटनेद्वारे हे लोण पसरवलं जातंय, त्यामागे कोणता पक्ष आहे, हे सर्वश्रुत आहे. अनेक वर्षांपासून या संघटनेला भाजपचेचे खतपाणी आहे. आज महाराष्ट्रात सुरु असलेल्या जाळपोळ आणि दंगलींमागे कोण आहे, हे यावरून स्पष्ट होते. रझा अकादमी हे भाजपचंच पिल्लू आहे. त्यामुळे त्यांच्याच पाठिंब्याने त्रिपुरातलं लोण इथवर पोहोचलं आहे. अन्यथा तिकडे त्रिपुरात घडलेल्या दंगलींचे पडसाद इथे पडण्याचे काय कारण, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये तणाव

त्रिपुरातील हिंसेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अमरावती, नांदेड, परभणी, मालेगाव, नाशिकमध्ये मुस्लिमांनी प्रचंड मोर्चे काढत जोरदार आंदोलन केलं आहे. आज अमरावतीतदेखील जोरदार आंदोलन पेटलं आहे. काल काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. जमावाने पोलिसांवरच दगडफेक केल्याने पोलिसांनीही जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला.

इतर बातम्या-

Pune Crime | किरण गोसावीच्या अडचणीत वाढ; दुबईवरून आलेल्या महिला साथीदाराला अटक

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.