AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OBC आरक्षण कायमचे गोठवण्याचा ठाकरे सरकारचा कट, औरंगाबादेत भाजप आमदार अतुल सावे यांचा आरोप

औरंगाबादः राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील तीनही पक्षांची ओबीसींना राजकीय आरक्षण (OBC Reservation) देण्याची इच्छा शक्ती नाही. अशीच चालढकल करून ओबीसींचे आरक्षण कायमचे गोठवण्याचा ठाकरे सरकारचा कट आहे, असा आरोप भाजपचे आमदार, प्रदेश सरचिटणीस अतुल सावे (Atul Save) यांनी केला. औरंगबाादमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. काय म्हणाले आमदार अतुल सावे? आमदार […]

OBC आरक्षण कायमचे गोठवण्याचा ठाकरे सरकारचा कट, औरंगाबादेत भाजप आमदार अतुल सावे यांचा आरोप
आमदार अतुल सावे
| Edited By: | Updated on: Dec 18, 2021 | 3:03 PM
Share

औरंगाबादः राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील तीनही पक्षांची ओबीसींना राजकीय आरक्षण (OBC Reservation) देण्याची इच्छा शक्ती नाही. अशीच चालढकल करून ओबीसींचे आरक्षण कायमचे गोठवण्याचा ठाकरे सरकारचा कट आहे, असा आरोप भाजपचे आमदार, प्रदेश सरचिटणीस अतुल सावे (Atul Save) यांनी केला. औरंगबाादमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

काय म्हणाले आमदार अतुल सावे?

आमदार अतुल सावे यांनी औरंगाबादमध्ये गुरुवारी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले देवेंद्र फडणवीस सरकारने 31 जुलै 2019 रोजी काढलेला अध्यादेश कायद्यात परिवर्तित करण्यात जाणीवपूर्वक चालढकल केल्याने तो अध्यादेश रद्दबातल झाला. तेव्हाच ठाकरे सरकारचा हेतू स्पष्ट झाला होता. त्यानंतर ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा न्याय कसा, हे स्पष्ट करण्याच्या न्यायालयाच्या आदेशावर कार्यवाही करण्यात तब्बल 15 महिने चालढकल केली आणि आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्या पलीकडे जात असल्याचे सांगून ते पुनस्त्थापित करण्याचे मार्ग स्वतःच बंद केले, असा आरोप अतुल सावे यांनी केला.

इम्पेरीकल डाटा तयार करणे हाच एकमेव मार्ग

यावेळी आमदार सावे म्हणाले, राज्य सरकारने आतापर्यंत वारंवार केंद्र सरकारकडे बोटं दाखवून आंदोलनं, निदर्शनं केली. मात्र ओबीसी आरक्षणासाठी इम्पेरीकल डाटा लवकरात लवकर तयार करणे हाच योग्य मार्ग आहे. या उलट केंद्र सरकार इम्पेरीकल डेटा देत नसल्याचा कांगावा केला गेला. आता सर्वोच्च न्यायालयानेच राज्य सरकारचे कान उपटले असल्याने इम्पेरीकल डाटा तयार करणे ही राज्य सरकारचीच जबाबदारी असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे आमदार अतुल सावे म्हणाले.

इतर बातम्या-

Amit Shah: सहकार वाचवण्यासाठी समित्या स्थापन करणार नाही, अमित शहांनी सांगितला नवा प्लान!

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते तर तुम्ही कुठे असता?, शिवसेनेच्या खासदाराचा अशोक चव्हाणांना सवाल

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.