AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad News: बाबा रागावल्याने रात्री निघून गेला, मुंबईच्या गाडीत बसला, सकाळी थेट पोलिसांनीच उतरवून घेतले!

वडील रागावल्याने घरातून निघून गेलेल्या मुलाने थेट रेल्वेस्टेशन गाठले होते. मात्र नातेवाईक वेळेवर पोलीस स्टेशनला पोहोचले आणि पोलिसांनीही तत्काळ सहकार्य केल्याने सुदैवाने मुलगा सुखरूप पालकांकडे परतला.

Aurangabad News: बाबा रागावल्याने रात्री निघून गेला, मुंबईच्या गाडीत बसला, सकाळी थेट पोलिसांनीच उतरवून घेतले!
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Dec 21, 2021 | 12:54 PM
Share

औरंगाबादः राज्यभर पसरलेले पोलिसांचे जाळे सतर्क असले आणि वेळेवर मदत मिळाली तर अनेक गंभीर प्रकार होण्यापासून रोखता येतात, याचाच दाखला औरंगाबादमध्ये घडलेल्या घटनेतून मिळाला. वडील रागावल्याने 15 वर्षांचा मुलगा घरातून रात्रीच्या वेळी निघून गेला. ही माहिती पोलिसांना कळाली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने तो कुठे गेला, कोणत्या ट्रेनमध्ये बसला, या सगळ्याची माहिती रात्रीतून मिळवली. सुदैवाने मुंबईत ट्रेन थांबताच मुलगा उतरला तेव्हा तो सुरक्षित हातातच सापडला.

काय घडलं नेमकं?

झालं असं की, सातारा परिसरातील एका घरातील 15 वर्षाच्या मुलाला वडिलांनी रागवालं. याचं कारण होतं, त्याने वडिलांच्या पाकिटातून 100 रुपये काढले. गोल्डन कलरचा पेन घेण्यासाठी त्याने हे पैसे घेतल्याने वडिलांनी मुलाला रागावले आणि त्या मारही बसला. या सगळ्या प्रकाराचा राग मनात धरून मुलगा घराबाहेर पडला. काही वेळात तो परत येईल, असे सगळ्यांना वाटले. पण रात्रीचे 9 वाजले तरी मुलगा आला नाही, म्हणून घाबरलेले नातेवाईक सातारा पोलीस स्टेशनला पोहोचले. त्यांची भेट पोलीस निरीक्षक पातारे यांच्याशी झाली. त्यानंतर पोलिसांनी लगोलग तपासाची सूत्र हलवली.

सीसीटीव्ही फुटेजद्वारे लावला शोध

सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गौतम पातारे हे रात्रगस्तीवर असताना 15 वर्षांचा मुलगा घरातून निघून गेल्याची माहिती त्यांना कळली. त्यांनी रेल्वे पोलीस स्थानकात धाव घेत पहाटेपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यात मुलगा मुंबईकडे जाणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये चढताना दिसला. पोलिसांनी सर्व स्थानकांतील पोलिसांकडे मुलाचे छायाचित्र पाठवले. पण तो रस्त्यात कुठेही उतरला नाही. मुंबईत सकाळी 6 वाजता सीएसटी स्थानकात उतरताच रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

इतर बातम्या-

जेसीबीनं खोदकाम सुरु होतं, अचानक झाला खणखणाट, औरंगाबादेत सापडले ब्रिटिशकालीन घबाड

Nashik Nagar Panchayat Polling…आधीच उल्हास त्यात थंडीचा मास…6 नगरपंचायतींच्या मतदानाकडे नागरिकांची पाठ

Follow Us
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?