AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद जिल्हा पूर्णपणे अनलॉक, 21 जूनपासून नियम शिथिल

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरल्यामुळे औरंगाबाद जिल्हा आता पूर्णपणे अनलॉक होणार आहे. सोमवारपासून जिल्ह्यातील लॉकडाऊनसंबंधित नियम शिथिल केले जाणार आहेत.

औरंगाबाद जिल्हा पूर्णपणे अनलॉक, 21 जूनपासून नियम शिथिल
Breaking News
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jun 19, 2021 | 6:59 PM
Share

औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरल्यामुळे औरंगाबाद जिल्हा आता पूर्णपणे अनलॉक होणार आहे. सोमवारपासून (21 जून) जिल्ह्यातील लॉकडाऊनसंबंधित नियम शिथिल केले जाणार आहेत. सोमवारपासून जिल्ह्यात जिम, सलून, मॉल्स, नाट्यगृह, चित्रपटगृह, विवाह,कार्यक्रमांना 50% क्षमतेच्या उपस्थितीची मुभा देण्यात आली आहे. तसेच आता शासकीय कार्यालयात 100 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती असणार आहे.

राज्यातील, देशातील कोरोना अजून संपलेला नाही, केवळ कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. त्यामुळे काही कडक निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय प्रसासनाने घेतला आहे. त्यामुळे कोरोना पुन्हा पसरू नये, कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळले पाहिजेत. मास्क लावा, सतत हात धुवा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा, या त्रिसुत्रीचं पालन करायला हवं, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

औरंगाबाद शहरात सक्तीचे लसीकरण!

मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. दुसरी लाट सरल्यामुळे लोक आता घराबाहेर पडू लागले आहेत. रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरण युद्धपातळीवर राबविने गरजेचे आहे. तसे प्रयत्न विविध जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनाकडून केले जात आहेत. मात्र, असे असले तरी औरंगाबादकर लसीकरणाविषयी सतर्क आणि जागरुक असल्याचे दिसत नाही. येथे लसीकरणाकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. जिल्ह्यातील लसीकरणाची टक्केवारी वाढत नाहीये. याच कारणामुळे औरंगाबाद पालिका तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. मनपा प्रशासक पांडे हे औरंगाबाद शहरात लसीकरण सक्तीचे करण्याचा विचार करत आहेत.

21 जूनपासून 18 वर्षावरील नागरिकांना लस देण्याचे नियोजन

सध्या औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 35 हजार लसी उपलब्ध आहेत. नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे लसीकरणाची टक्केवारी वाढवण्यासाठी औरंगाबाद मनपाकडून येत्या 21 जूनपासून 18 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. सध्या यावर काम सुरु आहे.

लसीकरणाची टक्केवारी वाढवण्याचे आव्हान

दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे या वेळेत तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याची तयारी प्रशासनाकडून केली जातेय. याच काळात तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी व्हावी म्हणून लसीकणाचा कार्यक्रम युद्धपातळीवर राबवणे गरजेचे आहे. मात्र, औरंगाबादेत लसीकरणाची टक्केवारी वाढत नसल्यामुळे ही चिंतेची बाब असून त्यासाठी उपायोजना करण्याचे आव्हान येथील प्रशासनापुढे आहे.

औरंगाबादेत शाळा सुरु करण्याचे नियोजन करा – जिल्हाधिकारी

नुकतंच औरंगाबादेत शाळा सुरु करण्याचे नियोजन करा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यानुसार, प्रत्येक शाळेत शाळा नियोजन समितीची बैठक घ्या, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच शाळा निर्जंतुकीकरण कारण्यासोबत हात धुणे, सॅनिटायझर वापरण्याचे नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाने आदेश दिल्या जात आहे. त्यामुळे औरंगाबाद शहर जिल्ह्यातील शाळा सुरु होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

औरंगाबाद शहरात सक्तीचे लसीकरण ? 21 जूनपासून 18 वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचे नियोजन

औरंगाबादेत शिक्षकांसाठी शाळेचे दार उघडले, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची माहिती

 

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा