AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद शहरात सक्तीचे लसीकरण ? 21 जूनपासून 18 वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचे नियोजन

लसीकरणाची टक्केवारी वाढत नसल्यामुळे लसीकरण सक्तीचे करण्याचा विचार औरंगाबाद महानगरपालिकेकडून केला जात आहे.

औरंगाबाद शहरात सक्तीचे लसीकरण ? 21 जूनपासून 18 वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचे नियोजन
Corona vaccination
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: | Updated on: Jun 17, 2021 | 5:14 PM
Share

औरंगाबाद : टक्केवारी वाढत नसल्यामुळे लसीकरण सक्तीचे करण्याचा विचार औरंगाबाद महानगरपालिकेकडून केला जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सध्या 35 हजार लसी पडून आहेत. लसी असूनही नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. याच कारणामुळे मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडे यांच्याकडून हा विचार केला जातोय. (Municipal Corporation is thinking  of compulsory Corona Vaccination to all Aurangabad citizens)

सर्वांना लसीकरण सक्तीचे

मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. दुसरी लाट सरल्यामुळे लोक आता घराबाहेर पडू लागले आहेत. रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरण युद्धपातळीवर राबविने गरजेचे आहे. तसे प्रयत्न विविध जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनाकडून केले जात आहेत. मात्र, असे असले तरी औरंगाबादकर लसीकरणाविषयी सतर्क आणि जागरुक असल्याचे दिसत नाही. येथे लसीकरणाकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. जिल्ह्यातील लसीकरणाची टक्केवारी वाढत नाहीये. याच कारणामुळे औरंगाबाद पालिका तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. मनपा प्रशासक पांडे हे औरंगाबाद शहरात लसीकरण सक्तीचे करण्याचा विचार करत आहेत.

सध्या 35 हजार लसी पडून

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची टक्केवारी वाढत नाहीये. लोक लसीकरणासाठी उत्सुक नसल्याचे दिसत आहे. सध्या औरंगाबाद जिल्ह्यात 35 हजार लसी पडून आहेत. लसी उपलब्ध असल्या तरी लोक लस टोचून घेत नाहीयेत. याच कारणामुळे सध्या औरंगाबाद शहरात सर्वांना सक्तीची कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा विचार सुरु आहे.

21 जूनपासून 18 वर्षावरील नागरिकांना लस देण्याचे नियोजन

सध्या औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 35 हजार लसी उपलब्ध आहेत. नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे लसीकरणाची टक्केवारी वाढवण्यासाठी औरंगाबाद मनपाकडून येत्या 21 जूनपासून 18 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. सध्या यावर काम सुरु आहे.

लसीकरणाची टक्केवारी वाढवण्याचे आव्हान

दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे या वेळेत तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याची तयारी प्रशासनाकडून केली जातेय. याच काळात तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी व्हावी म्हणून लसीकणाचा कार्यक्रम युद्धपातळीवर राबवणे गरजेचे आहे. मात्र, औरंगाबादेत लसीकरणाची टक्केवारी वाढत नसल्यामुळे ही चिंतेची बाब असून त्यासाठी उपायोजना करण्याचे आव्हान येथील प्रशासनापुढे आहे.

इतर बातम्या :

Video : लॉकडाऊनच्या काळात नोकरी गेली, पोरांनी थेट गाव गाठलं, मत्स्य शेतीतून 8 महिन्यात तब्बल 10 लाख रुपयांचं उत्पन्न!

फिरायला जाताय? मग पर्यटन राजधानी तुमच्यासाठी खुली!, कोणती पर्यटनस्थळं सुरु?

मराठवाडा वॉटर ग्रीड योजना संकटात, योजनाला सिंचन विभागाचा तीव्र विरोध

(Municipal Corporation is thinking  of compulsory Corona Vaccination to all Aurangabad citizens)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ