AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त; पिकांचे होणार नुकसान

सध्या औरंगाबाद जिल्ह्यासह अनेक ठिकाणी रब्बीचा हंगामा सुरू आहे. त्यातच पाऊत सुरु झाल्याने रब्बी हंगामाला जोराचा फटका बसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

औरंगाबादमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त; पिकांचे होणार नुकसान
| Updated on: Jan 24, 2023 | 11:48 PM
Share

औरंगाबादः गेल्या काही दिवसापासून शेतकरी वेगवेगळ्या संकटामुळे मेटाकुटीला आलेला असतानाच आज औरंगाबादसह जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणा पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होणार आहे. आज दिवसभर औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते. त्यामुळे पावसाची शक्यता वर्तवली जात होती, त्यातच रात्री आठ वाजल्यानंतर शहरासह जिल्ह्यातील काही गावांमध्ये जोरदार पाऊस झाल्याचे सांगण्यात येत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर, दहेगाव, शेंदूरवाडा तर पैठणमधील बिडकीन, लोहगाव, सोमपुरी, वाळूज या परिसरात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरुपाचा पाऊस झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दौलताबाद परिसरातही रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने अनेक परिसराती शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी रिमझिम तर अनेक ठिकाणी जोरदार स्वरुपाचा पाऊस झाला आहे तर त्याच वेळी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

सध्या औरंगाबाद जिल्ह्यासह अनेक ठिकाणी रब्बीचा हंगामा सुरू आहे. त्यातच पाऊत सुरु झाल्याने रब्बी हंगामाला जोराचा फटका बसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ऐन रब्बीच्या हंगामामध्ये अवकाळी पाऊस झाल्याने शेतीला त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आज झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीच्या पिकांसह जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी नागरिकांचेही नुकसान झाले आहे. रब्बी हंगामामध्ये पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.

गेल्या दोन वर्षापासून कधी पावसाचे संकट तर कधी बाजारभावाचे संकटामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच आज अवकाळी पाऊस झाल्यामुळे  शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.