AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळासाहेब थोरात धमकी प्रकरण, संग्राम बापू भंडारे महाराजांच स्पष्टीकरण, त्या दिवशी किर्तनात काय घडलं?

"मी नथुराम गोडसेंचा विचार वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर मांडलाय का? मांडू पण शकतो, तो ही अधिकार मला संविधानाने दिला आहे. बाळासाहेब थोरातांना अंतर्मुख करण्यासाठी, त्यांनी माझ्या विरोधात चुकीचा व्हिडिओ पसरवला. हल्ल्याच गांभीर्य त्यांनी समजून घ्यावं" असं संग्राम बापू भंडारे महाराज म्हणाले.

बाळासाहेब थोरात धमकी प्रकरण, संग्राम बापू भंडारे महाराजांच स्पष्टीकरण, त्या दिवशी किर्तनात काय घडलं?
balasaheb thorat-bhandare maharaj
| Updated on: Aug 21, 2025 | 11:14 AM
Share

माजी आमदार बाळासाहेब थोरात यांना धमकावल्याप्रकरणी आज संगमनेरमध्ये मोर्चा निघाला आहे. किर्तनाच्यावेळी वाद सुरु झाला, त्यातून हे सर्व प्रकरण घडलं. संग्राम बापू भंडारे महाराज या वादाच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांनी बाळासाहेब थोरातांवर गंभीर आरोप केले आहेत. बाळासाहेब थोरातांनी माझ्याबाबत चुकीचा व्हिडिओ पसवरला. नथुराम गोडसेंचा विचार मांडण्याचा अधिकार मला संविधानाने दिलाय असं संग्राम बापू भंडारे महाराज म्हणाले. आज या संग्राम बापू भंडारे महाराज यांनी या वादात त्यांची बाजू मांडली. ते टीव्ही 9 मराठीशी बोलले.

“16 ऑगस्ट 2025 रोजी संगमनेर भुलेवाडी गावात माझा धर्म किर्तनाचा कार्यक्रम 9 वाजता सुरु झाला. मी भगवान तुकराम महाराजांच्या अभंगावर निरुपण सुरु केलं. काही लोक तिथे मुद्दाम भांडण्यासाठीच आले होते” असा दावा संग्राम बापू भंडारे महाराज यांनी केला. “किर्तन चालू होतं, त्यांना भांडण्यासाठी मुद्दा भेटत नव्हता. अखेर 10.30 वाजण्याच्या सुमारास एकाने चालू किर्तनात बडबडायला सुरुवात केली. मी त्यांना शांत बसण्याची विनंती केली. पण ती व्यक्ती उभी राहून बोलू लागली. त्यावेळी मी सहकाऱ्यांना विनंती केली की, यांचा काहीतरी मानसिक प्रॉब्लेम आहे यांना बाजूला न्या” असं संग्राम बापू भंडारे महाराज म्हणाले.

‘जर त्या दिवशी पाच-पन्नास हिंदुत्ववादी नसते तर?’

“त्याचवेळी पाच-सहाजण एक्टिव झाले. माझ्या अंगावर धावून आले. त्याचवेळी पाच पन्नास हिंदुत्ववादी भगव्या टोप्या घालून आमचे सहकारी तिथे होते, त्यांनी जागेवरच त्यांना रोखलं. जर त्या दिवशी पाच-पन्नास हिंदुत्ववादी नसते तर?” असा प्रश्न संग्राम बापू भंडारे महाराजांनी विचारला.

वारकरी संप्रदायात नथुराम गोडसेंचे विचार कधीपासून आले? 

“मी नथुराम गोडसेंचा विचार वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर मांडलाय का? मांडू पण शकतो, तो ही अधिकार मला संविधानाने दिला आहे. बाळासाहेब थोरातांना अंतर्मुख करण्यासाठी, त्यांनी माझ्या विरोधात चुकीचा व्हिडिओ पसरवला. हल्ल्याच गांभीर्य त्यांनी समजून घ्यावं. असं हल्लेखोरांना समर्थन दिलं, तर संगमनेर पेटेल” असं संग्राम बापू भंडारे महाराज बोलले. “हल्लेखोरांच्या मागे थोरात उभे राहिले, असं नरेटिव्ह सेट झालं, तर पोरं उद्या हल्ले करतील थोरात मागे आहेत बोलतील. बाळासाहेब थोरातांनी आत्मपरिक्षण करावं. थोरातांनी 40 वर्ष संगमनेरच नेतृत्व केलं, आज एका धर्म कितर्नकारावर तुटून पडताय, थोरातांनी आत्मपरिक्षण करावं” असं संग्राम बापू भंडारे महाराज म्हणाले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.