AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संतोष देशमुख हत्याप्रकरणी अंजली दमानियांचा नवा आरोप, वाल्मिक कराडचं नाव घेत म्हणाल्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही….

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडला तुरुंगात व्हीआयपी सुविधा मिळत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरणी अंजली दमानियांचा नवा आरोप, वाल्मिक कराडचं नाव घेत म्हणाल्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही....
walmik karad anjali Damania
| Updated on: Jun 04, 2025 | 10:40 AM
Share

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा सध्या तुरुंगात आहे. गेल्या काही महिन्यांपासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यातच आता अंजली दमानिया यांनी राज्य सरकार आणि विविध तपास यंत्रणांवर भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये कारवाई होत नसल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतरही अनेक आरोपींची मालमत्ता जप्त करण्यात आलेली नाही. तसेच काही आरोपींना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.

वाल्मिक कराडला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू

अंजली दमानिया यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वाल्मिक कराडला तुरुंगात मिळत असलेल्या व्हिआयपी ट्रिटमेंटबद्दल भाष्य केले आहे. “२८ डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांनी सर्व आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते, परंतु वाल्मिक कराडची मालमत्ता अजूनही जप्त करण्यात आलेली नाही. त्यांना पाठीशी घालण्याचे प्रकार सुरु आहे. तसेच वाल्मिक कराडला मकोकामधून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असून, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील” अशी शक्यता अंजली दमानिया यांनी वर्तवली.

प्रत्येक जेलमध्ये पैशाची मागणी

“संतोष देशमुख प्रकरणी अजूनही फरार कृष्णा आंधळेला अटक झालेली नाही. त्यांचे मोबाईल देखील जप्त करण्यात आलेले नाहीत. जेव्हा मी त्यांच्या अनेक प्रकरणाच्या माहिती घेत होते, तेव्हा माझ्या कानावर असा आला होता कराडला बीडमध्ये ठेवण्यामागे सुद्धा जालिंदर सुपेकर हेच आहे. प्रत्येक जेलमध्ये सुद्धा पैशाची मागणी केली जात आहे”, असेही अंजली दमानियांनी म्हटले.

सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांनी मोठ्या प्रमाणात पैसे खाल्ले

“आज सुरेश काही असा आरोप केला आहे की 300 कोटीच्या मागणी जालिंदर सुपेकर यांनी केली होती. आता त्याच्यापुढे पण अनेक खुलासे होतील. हेच नाही तर गण लायसन्स प्रकरणात पण सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांनी मोठ्या प्रमाणात पैसे खाल्ले गेले आहेत. त्याची सुद्धा चौकशी मुख्यमंत्र्यांनी लावली आहे”, असेही अंजली दमानिया म्हणाल्या.

Follow Us
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक..
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक...
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले.....
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले......
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?.
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया.
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा...
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा....
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग.
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र...
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र....
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत.
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....