AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबा साखर कारखाना पवारांच्या घशात घालण्याचा डाव, माजी आमदार माणिक जाधव यांचा आरोप

बीडः  मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाचा म्हणून अंबा सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे. याच अंबाजोगाई येथील अंबा सहकारी साखर कारखान्याने यापूर्वी साखर कारखान्याचे 25 एकर जमीन विकली आहे आणि आता पंधरा वर्षासाठी हा साखर कारखाना खासगी कंपनीला चालवण्यासाठी देऊन हा साखर कारखाना पवारांच्या (Sharad Pawar) घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप कामगार नेते आणि माजी आमदार माणिकराव जाधव […]

अंबा साखर कारखाना पवारांच्या घशात घालण्याचा डाव, माजी आमदार माणिक जाधव यांचा आरोप
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jan 06, 2022 | 12:41 PM
Share

बीडः  मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाचा म्हणून अंबा सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे. याच अंबाजोगाई येथील अंबा सहकारी साखर कारखान्याने यापूर्वी साखर कारखान्याचे 25 एकर जमीन विकली आहे आणि आता पंधरा वर्षासाठी हा साखर कारखाना खासगी कंपनीला चालवण्यासाठी देऊन हा साखर कारखाना पवारांच्या (Sharad Pawar) घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप कामगार नेते आणि माजी आमदार माणिकराव जाधव (Manikrao Jadhav) यांनी केला आहे. ते अंबा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये आयोजित ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांच्या बैठकीत बोलत होते.

शेतकरी, कामगारांच्या बैठकीत काय चर्चा?

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या व कामगारांच्या थकीत पैशा संदर्भात व अंबासाखर कारखाना विनाविलंब चालू झाला पाहिजे आदी मुद्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. 4 महिन्यांपासून शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांवर येथील कारखाना प्रशासनाने व संचालक मंडळाने कुठलीही दखल न घेतल्याने शेतकरी व कामगार आक्रमक झाले आहेत. अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या चालू होत असलेल्या गळीत हंगामात कुठलाही प्रकारचा अडथळा न येऊ देता तो कारखाना सुरळीत चालला पाहिजे. तसेच तो कारखाना विद्यमान संचालक मंडळानेच सक्षम पद्धतीने चालवला पाहिजे, कोणत्याही खाजगी एजन्सीला अथवा त्रयस्थ व्यक्तीला कारखाना भाड्याने अथवा विक्री करून चालवायला देऊ नये, विद्यमान संचालक मंडळाला कारखाना चालू करण्यास काही अडचणी असतील तर आम्ही त्यास सर्वतोपरी मदत करू असा विश्वास माजी आमदार माणिक राव जाधव यांनी व्यक्त केला आहे.

इतर बातम्या-

PM Security Breach: पंजाब पोलिसांकडून गुप्तचर विभागाच्या माहितीकडे दुर्लक्ष, ब्ल्यू बुक नियमांकडे कानाडोळा; केंद्रीय गृहमंत्रालयाने ठेवलं बोट

PM Security Breach: पंजाबचे पोलीस महासंचालक, मुख्य सचिवांना निलंबित करा; सर्वोच्च न्यायालयात याचिका

Follow Us
पुणे हादरलं! हॉस्पिटल उडवण्याचा कट; बाथरूममध्ये टाईम बॉम्ब ठेवणारा....
पुणे हादरलं! हॉस्पिटल उडवण्याचा कट; बाथरूममध्ये टाईम बॉम्ब ठेवणारा.....
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर....
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर.....
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?.
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.