AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीआयडीने कोर्टात संतोष देशमुखांच्या हत्येचं कारण सांगितलं, धनंजय देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया काय?

आरोपींनी संतोष देशमुख यांची हत्या का केली? त्यामागचं कारण सीआयडीने आज कोर्टात सांगितलं. त्यानंतर वाल्मिक कराडला कोर्टाने सात दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. यानंतर आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

सीआयडीने कोर्टात संतोष देशमुखांच्या हत्येचं कारण सांगितलं, धनंजय देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया काय?
धनंजय देशमुख
| Updated on: Jan 15, 2025 | 6:39 PM
Share

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आज महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. आरोपी वाल्मिक कराड याला आज बीड कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी एसआयटी आणि सीआयडीने वाल्मिक कराड याच्या विरोधात मोठमोठे दावे करत त्याच्या 10 दिवसांची सीआयडी कोठडी मागितली. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी वाल्मिक कराड हा इतर आरोपींच्या संपर्कात होता, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी कोर्टात केला. तसेच संतोष देशमुख हे खंडणी प्रकरणात अडथळा ठरत होते म्हणून आरोपींनी कट रचून त्यांची हत्या केली. विशेष म्हणजे हत्येच्या दिवशी वाल्मिक कराडने संतोष देशमुखांना धमकी दिली होती, असा मोठा युक्तिवाद सरकारी वकिलांनी कोर्टात केला. यानंतर कोर्टाने वाल्मिक कराडला 7 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली. या सर्व घडामोडींनंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

“न्यायालयीन प्रक्रिया आहे. ती चालू राहणार आहे. आम्ही तपासासंदर्भात अपडेट घेतली. तपास योग्य दिशेने सुरू आहे. आम्हाला विश्वासात घेतलं की योग्य दिशेने तपास सुरू आहे”, असं धनंजय देशमुख यांनी सांगितलं. यावेळी देशमुखांना वाल्मिक कराड आणि इतर आरोपींच्या फोन कॉलचे पुरावे कोर्टात सादर करण्यात आले. त्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “साधारण त्याचवेळेत ही घटना घडली होती. दुपारी सव्वा तीनच्या नंतर ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत फोन कॉल झाला. दोन-तीन तासांचा तो कालावधी आहे. योग्य दिशेने तपास आहे. तपास बाकी आहे. त्यामुळे त्या तपासाकडे आपले लक्ष आहे. काय काय कनेक्शन सापडतात ते समोर येईल”, अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली.

‘हत्या केली त्यांना फाशीची शिक्षा द्या’

वाल्मिक कराडच्या वकिलांनी केलेल्या दाव्याबाबत धनंजय देशमुख यांना प्रश्न विचारला असता, “आपण त्यावर बोलणार नाही. तो तपासाचा भाग आहे. ते कोर्टात स्पष्टीकरण देतील. तो युक्तिवाद आहे. आपण न्याय मागतोय. न्याय आपण यंत्रणेला मागितला आहे. आपली न्यायाची भूमिका आहे. आपण न्याय मागतोय वकिलाच्या युक्तिवादात जाण्याची गरज नाही. त्यांचे ते काम करतात. आरोपी कोण आहे, सहआरोपी कोण आहे, ज्यांनी हत्या केली त्यांना फाशीची शिक्षा द्या. यावर आपण ठाम आहोत. न्यायालयीन गोष्टींचा भाग असल्यामुळे त्यावर जास्त बोलणे उचित नाही”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

सीआयडी अधिकाऱ्यांसोबत काय चर्चा?

धनंजय देशमुख यांनी आज सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली. याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “सीआयडी अधिकाऱ्यांना आज सहज भेटलो. तपासाबाबत माहिती घेतली आणि निघून आलो. एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली यांची कालच भेट घेतली होती. त्यामुळे आज परत भेट घेण्याची गरज वाटली नाही”, असं धनंजय देशमुख यांनी सांगितलं. “कोर्टात पण असंच गेलो होतो. प्रत्येक गोष्टीचा थोडा आढावा आपल्याकडे असणं अपेक्षित आहे. आज आम्ही कोर्टात जवाब दिला नाही. ते आजच्या तारखेचा स्पष्टीकरण येईल, उद्या जवाब देणार आहेत का ते नक्की नाही ज्या दिवशी तारीख देतील त्या दिवशी देणार आहोत”, असं देखील धनंजय देशमुख यांनी सांगितलं.

मनोज जरांगेंच्या भेटीत काय चर्चा?

धनंजय देशमुख यांनी मराठा नेता मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता, “काही चर्चा होणार नाही. सहज जाऊन चक्कर मारून दादांना भेटून येतो. ज्यावेळेस आम्हाला वाटेल दादांची भेट घ्यायची त्यावेळेस आम्ही घेतो”, अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली.

सुरेश धस यांच्यावर केल्या जाणाऱ्या आरोपांवर काय म्हणाले?

वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर आरोप केले जात आहेत. यावरही धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. “त्याच्या भूमिकेत हे सगळे आहेत. त्यांनी न्याय मागितला आहे. न्याय मागणाऱ्या लोकांना कोणी ब्लेम करत असेल तर चुकीचं आहे. न्याय मागताना त्यांची भूमिका न्यायाची आहे, त्यांच्या भावना न्यायाच्या आहेत. जे सगळे लोकप्रतिनिधी आहेत, विविध संघटनांमधील लोक, हे न्यायाच्या भूमिकेत आहेत आणि न्याय मागत आहेत”, असं धनंजय देशमुख म्हणाले.

परळीतील आंदोलनावर काय म्हणाले?

यावेळी त्यांनी परळी वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून केल्या जाणाऱ्या आंदोलनावरही प्रतिक्रिया दिली. “प्रशासनाने त्याच्यावर विचार केला पाहिजे. हे काय चाललंय काय आणि हे कशासाठी आहे? तो त्यांचा पार्ट आहे आपला पार्ट न्याय मागणं आहे”, असं धनंजय देशमुख म्हणाले.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.