AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जनावराच्या गोठ्याला भीषण आग; आगीत लाखो रुपयांचे नुकसान, बीडमधील अर्धपिंपरी येथील घटना

जनावाराच्या (Cattle) गोठ्याला अचानक आग (Fire) लागल्याची घटना बीड जिल्ह्यातील अर्धपिंपरीमध्ये (ardhapimpri) घडली आहे. या आगीत शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेत दोन जनावरे दगावली असून, पाच शेळ्या आणि एक वासरू आगीमध्ये होरपळल्याने जखमी झाले आहे.

जनावराच्या गोठ्याला भीषण आग; आगीत लाखो रुपयांचे नुकसान, बीडमधील अर्धपिंपरी येथील घटना
जनावरांच्या गोठ्याला आग
| Updated on: Mar 11, 2022 | 10:43 PM
Share

बीड : जनावाराच्या (Cattle) गोठ्याला अचानक आग (Fire) लागल्याची घटना बीड जिल्ह्यातील अर्धपिंपरीमध्ये (ardhapimpri) घडली आहे. या आगीत शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेत दोन जनावरे दगावली असून, पाच शेळ्या आणि एक वासरू आगीमध्ये होरपळल्याने जखमी झाले आहे. दादासाहेब लक्ष्मण यमगर असे या शेतकऱ्याचे नाव आहे. यमगर यांच्या घराशेजारील गोठ्याला अचानक आग लागली. आगीची घटना कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन, आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्ररुप धारण केल्याने या घटनेत दोन जनावरे दगावली तर पाच शेळ्या जखमी झाल्या आहेत. आग नियंत्रणात आल्याची माहिती ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

लाखो रुपयांचे नुकसान

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, दादासाहेब यमगर हे अर्धपिंपरी परिसरातील शेतवस्तीवर वास्तव्यास आहेत. ते शेतीसोबतच जोडधंदा म्हणून गुरांचे पालन देखील करतात. आज दुपारच्या सुमारास त्यांच्या घराच्या शेजारी असलेल्या जनावाराच्या गोठ्याला अचानक आग लागली. या घटनेत यमगर यांचे मोठे नुकसान झाले आहे. आगीमध्ये जळून दोन जनावरे दगावली आहेत, तर पाच शेळ्या आगीत होरपळ्याने जखमी झाल्या आहोत. या घटनेत यमगर यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडून घटनेचा पंचनामा

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पशुसंवर्धन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह मंडळ अधिकारी, सरपंच आणि उपसरंपच यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानाचा आढावा घेतला. पशुसंवर्धन अधिकाऱ्याच्या उपस्थितीत मृत जनावरांचे शवविच्छेदन करून घटनेचा पंचनामा करण्यात आला. उन्हाळा सुरू झाला असून, उन्हाळ्यात अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडत असतात. अशाप्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी काय खबरदारी घ्यावी याबाबत पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

Thane Crime : बनावट दारूच्या बॉटलचे झाकण बनवणाऱ्या कंपन्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Jammu-Kashmir : काश्मिर खोर्‍यात दहशतवाद्यांचा उच्छाद सुरूच; आणखी एका सरपंचाची हत्या

देवदर्शन करुन परतणाऱ्यांवर काळाचा घाला! अक्कलकोट-गाणगापूर रोडवर भीषण अपघात, 5 जण जागीच ठार

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली