AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“या जिल्ह्याचे पालकमंत्री बेपत्ता” ; शोधून काढणाऱ्याला मिळणार इतक्या हजारांचे बक्षीस

या वर्षी शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. तरीही शासनाकडून योग्य ती मदत अजूनही मिळाली तर नाहीच मात्र लोकप्रतिनिधी असलेले सत्तेतील नेत्यानीही शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळेच आता शेतकरी आक्रमक झाले आहेत.

या जिल्ह्याचे पालकमंत्री बेपत्ता ; शोधून काढणाऱ्याला मिळणार इतक्या हजारांचे बक्षीस
| Updated on: Apr 29, 2023 | 8:09 PM
Share

बीड : मागील दोन महिन्यापासून राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. गहू, मका, द्राक्षांसह अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ऐन हंगामात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अवकाळी आणि गारपीटीनंतर शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान देण्याचे सरकारने जाहीर केले. त्यानुसार ज्या पिकांचे नुकसान झाले होते त्याची पाहणी करून पंचनामेही करण्यात आले मात्र अजूनही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत.

या कारणामुळे आता बीड जिल्ह्यातील शेतकरी संघटना आक्रमक झाली असून त्यांनी पालकमंत्र्यांविरोधात जोरदार पवित्रा घेतला आहे. त्यामुळे आता शेतकरी आणि सत्ताधाऱ्यांचा भविष्यात संघर्ष वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

बीड जिल्ह्यात अनेक वेळा अतिवृष्टी झाली आहे. तसेच गारपीट आणि अवकाळी पावसामुळे पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.

मात्र बीडचे पालकमंत्री अतुल सावे हे अद्याप बीडच्या बांधावर गेले नाहीत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आक्रमक झाली आहे.

संघटनेकडून पालकमंत्री बेपत्ता आहेत त्यांना शोधून काढणाऱ्या व्यक्तीला 51 रुपये बक्षीस देण्याचेही त्यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे.

त्या आशयाचे पोस्टरदेखील गेवराई तालुक्यात लावण्यात आले आहेत. त्यामुळे आता पालकमंत्र्यांविरोधात आता बीड जिल्ह्यात शेतकरी आक्रमक झाले आहे.

या वर्षी शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. तरीही शासनाकडून योग्य ती मदत अजूनही मिळाली तर नाहीच मात्र लोकप्रतिनिधी असलेले सत्तेतील नेत्यानीही शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळेच आता शेतकरी आक्रमक झाले आहेत.

लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्यानेच आता बीड जिल्ह्याचे पालकमंत्री बेपत्ता असल्याचे पोस्टर्स लावून लोकप्रतिनिधींविषयी असलेला राग व्यक्त करण्यात आला आहे.

स्वाभिमानीच्या प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांनी बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदा हल्लाबोल केला आहे. त्यामुळेच त्यांनी पालकमंत्री बेपत्ता असल्याचे पोस्टर्स लावून सत्ताधाऱ्यांविरोधात त्यांनी सडकून टीका केली आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.