AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होळीत कधी घानमाकड खेळले का?; तुम्हालाही आठवत असेल घानमाकडीचा खेळ

घानमाकडीच्या खोल खाचेत कोळशाचे तुकडे फसविले जातात. धनुष्याच्या आकाराच्या लाकडावर संतुलन साधत गोलगोल फिरवले जाते. या घानमाकडीच्या खेळात लहान मुले दंग होतात.

होळीत कधी घानमाकड खेळले का?; तुम्हालाही आठवत असेल घानमाकडीचा खेळ
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Mar 06, 2023 | 9:19 AM
Share

भंडारा : होळीचा सण जवळ आला की, आठवण येते ती घानमाकडीच्या खेळाची. भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात घानमाकडचा (कुरकुंजा) खेळ खेळला जातो. जिल्ह्यातील किताडी (बरड किंना) या गावात आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत घानमाकड खेळण्याच्या आनंद घेतला. पळसाच्या वक्राकार लाकडापासून गोलाकार फिरणाऱ्या आणि कर-कर असा आवाज येणाऱ्या या घानमाकडीबद्दल बालकात विशेष आकर्षण आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळातही आज हे खेळ ग्रामीण भागात घानमाकड खेळले जातात. माग महिना संपताच फाल्गून महिन्याची सुरुवात होऊन होळीची चाहूल लागते. होळीच्या एक महिना अगोदरपासूनच तयारी सुरू होते. शेणापासून चाकोल्या तयार केल्या जातात. तसेच गावातील उत्साही मुले घानमाकड तयार करतात.

लहानांसोबत मोठेही होतात दंग

गावालगतच्या जंगलात जाऊन पळसाचे वक्राकार लाकूड आणले जाते. लाकडाचा ओंडका जमिनीत गाढून त्याला टोक काढले जाते. त्या टोकावर वक्राकार लाकडाला मधोमध कोरुन ठेवले जाते. दोन्ही बाजूला मुलांना बसवून गोलगोल फिरवले जाते. घानमाकडीच्या खोल खाचेत कोळशाचे तुकडे फसविले जातात. धनुष्याच्या आकाराच्या लाकडावर संतुलन साधत गोलगोल फिरवले जाते. या घानमाकडीच्या खेळात लहान मुले दंग होतात. आज दुर्गम खेड्यामध्ये घानमाकड दिसत असले तरी शहरीकरणामुळे अनेक खेड्यातून ही घानमाकड आता नामशेष झाली आहे.

पळसाची फूल वेधतात लक्ष्य

होळीच्या सणापूर्वी लहान मुले शेणापासून चाकोल्या तयार करीत होते. चाकोल्या वाळू घालून त्याची हार बनवून होळीत टाकल्या जात होती. तसेच पळस फुलांपासून परंपरागत रंगही तयार केला जात होता. परंतु आता हा सर्व प्रकार मागे पडला आहे. असं असलं तरी काही हौशी लोकं घानमाकडाच्या खेळाची जपणूक करतात. पळसाला लाल फूलं लागली असतात. या फुलांपासून रंग तयार केला जातो. या फुलांची माळही घानमाकडीला लावली जाते. होळी हा रंगांचा सण. निसर्गही मोठ्या प्रमाणात रंगांची उधळण करतो. निसर्गात फिरल्यास हे चित्र दिसते.  जे दिसते ते समाजात अस्तित्वात असते. घानमाकड हे एक प्रतीक आहे. आपल्यालाही जीवनात असंच फिरावं लागते. त्यात आपण कसा आनंद घेतो, हे आपल्यावर अवलंबून आहे.

Follow Us
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा
भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण... मनसेचा थेट इशारा काय?
MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे...
Sushma Andhare on Bawankule | सुषमा अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे अन् मोदींनाही घेरलं
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
BJP Protest Against Amit Thackeray : माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
Gopichand Padalkar | 50 लाखांच्या फॉर्च्युनर, पण HSRP प्लेट नाही! गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांवरून नवा वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा
बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला...
Mumbai Hospital | बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला? व्हिडीओ व्हायरल; प्रशासन म्हणतं, रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न...
देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? हाकेंचा थेट सवाल
Laxman Hake | देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल; ओबीसी आरक्षणावरून घमासान
महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?
Supriya Sule | महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?; सुप्रिया सुळे यांचा सरकारला थेट सवाल